शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

शहरातून येणाऱ्यासोबत गावकऱ्यांनो असे वागणे बरे नव्हे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 18:22 IST

शहरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना गावकरी गावबंदी करत असल्याने त्यांना त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.

पुणे :  ज्या गावात जन्म झाला. लहानाचे मोठे झालो. शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आले. कामाच्या निमित्ताने शहरात गेल्यानंतरही गावासोबत नाळ जुळून राहिली. असे असताना देखील अनेक परगावच्या विद्यार्थी, कामगार, उद्योग व्यापार करणारे, नोकरी करणारे यांना गावकऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाहेरगावावरून आलेल्या प्रत्येकाला कोरोना आहे असे समजून त्याला चक्क गावात न घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारामुळे संबंधित व्यक्तीने गावाच्या विरोधातच दावे दाखल केले जातील. अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून तो रोखण्यासाठी सर्व स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या परिस्थितीत बाहेर गावावरून शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेले विद्यार्थी यांच्या जेवणाचे हाल होत असताना दिसून आले. यावेळी शहरातील विविध सेवाभावी संघटना यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाची समस्या दूर केली. अनेक जणांनी घरचा रस्ता धरला. यात कामगार, व्यावसायिक, तसेच महिला वर्गाचाही समावेश आहे. मात्र या व्यक्ती आपआपल्या गावी पोहचताच त्यांना वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ देण्यास मनाई केली. आता पोलीस प्रशासन यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले असताना गावकऱ्यांनी तो आदेश पुढे करत आपल्याच गावातील विद्यार्थी, कामगार यांना गावात येऊ दिले नाही. यामुळे शहरातून गावी गेलेल्या विद्याथी, कामगार, व्यावसायिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच वेळ पडल्यास संबंध गावाच्या विरोधात दावे दाखल करण्याची तयारी दर्शवली. 

या साऱ्या प्रकाराविषयी कायद्याच्या दृष्टिकोनातुन माहिती देताना ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड म्हणाले, गावात कुणाचे लग्न निघाले तर त्या पत्रिकेत किती जणांची नावे असतात. त्यावेळी कामानिमित्त किती व्यक्ती बाहेर आहेत याची माहिती मिळते. कर्फ्यू अंमलात आणल्यावर रस्त्यावर फिरकणे बंद झाले. बाजारपेठ बंद झाली. खानावळीना कुलूप लागले. अशावेळी अनेकांना आपले गाव आठवणे साहजिकच आहे. घरच्या माणसांना देखील शहरात असणाऱ्या माणसाबद्दल आस्था, काळजी होती. अनेक कुटुंबांनी त्या व्यक्तींना सामावून देखील घेतले. मात्र अद्याप काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. गावातील पंचायतीने आणि गाव पुढाऱ्यांनी ज्याचे गावात घर आहे त्यांना गावबंदी केली. 

मागील पाच ते सहा वर्षापासुन शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी सांगितले, गावातील व्यक्तींची मानसिकता अतिशय टोकाची आहे. त्यांनी रस्ते अडवले आहेत. घरच्या माणसांना गावाच्या पुढे जाऊन चालणार नाही. ते आम्हला अद्याप शहरात राहण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे आपल्याला कुठलाही आजार नाही याचे कागदोपत्री पुरावे दिल्यानंतर देखील गावकरी ऐकत नाहीत. याला काय म्हणावे? किमान 10 ते 15 हजार लोकसंख्या असलेल्या गावाकडची अशी परिस्थिती असेल तर दुर्गम भागातील खेड्यामध्ये काय चित्र असेल ? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

या गोष्टीचा विचार करणार आहोत की नाही...

१. कोरोनाची लागण होऊन तीन आठवडे संपले आहेत. या तीन आठवड्यात गावातील नेतेमंडळी इतर नेतेमंडळीना भेटायला जात होती. इतर गावातील पुढारी गावात येत होते. अशावेळी अनेक तरुण या नेत्यांसमवेत गर्दी करत होते. त्यांना लागण झाली असल्यास काय?

२. त्या गर्दीत सहभागी झालेले काही तरुण बाहेरगावाहून आले असतील तर त्यांना येऊ दिले की नाही ? काळजी जरूर घ्यावी. गावातील सरपंच, नेतेमंडळी यांची जबाबदारी असेल ती म्हणजे गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र त्यासाठी गावबंदी करण्याची गरज आहे का ? 

३. बाहेरगाव किंवा शहरातून आलेल्या व्यक्तीना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था गावाला सुलभ होते. शहरात तुलनेने ते अवघड आहे. गावात स्वतंत्र विलनिकरण कक्ष उभारता येणे शक्य आहे. शेतावर ठिकाणी याप्रकारे व्यवस्था करता येईल. काही गावात असे होत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेStudentविद्यार्थी