शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

घरे अतिक्रमणांच्या कचाट्यात, वसई विरार महानगरातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:03 IST

वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.

नालासोपारा - वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या आकडेवारीनुसार वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर अनधिकृत इमारती किंवा कब्जा करण्यात आलेला आहे. या आरक्षित भूखंडावर शाळा, क्रीडांगण, उद्यान, पोलीस स्टेशन, डंपिंग ग्राऊंड, बफर झोन ठेवण्यात आलेले आहे.वसई विरार मनपाच्या ९ प्रभागातील राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे समोर निदर्शनास आले आहे.ही सर्व माहिती भाजपाचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष राकेश सिंह यांनी माहिती अधिकारात मागवली आहे. लोकांनी मोठं मोठी स्वप्ने बघून हक्काची घरे विकत घेतली आहेत मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या प्रभाग ‘बी’ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ९०.६७ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत तर प्रभाग ‘सी’ मध्ये सगळ्यात कमी म्हणजेच २९.८९ टक्के राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. मनपाच्या नऊ प्रभागात अनुक्र मे ‘ए’ मध्ये ३०.८९ टक्के, प्रभाग बी मध्ये ९०.६७ टक्के, प्रभाग सी मध्ये २९.८९ टक्के, प्रभाग डी मध्ये ८७.९६ टक्के, प्रभाग ई मध्ये ६५.९६ टक्के, प्रभाग एफ मध्ये ८७.५ टक्के, प्रभाग जी मध्ये ४६.४७ टक्के, प्रभाग एच मध्ये ६३.७२ टक्के आणि प्रभाग आई मध्ये ३५.७९ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे झालेली आहेत. तर सध्या ५ टक्के राखीव भूखंडावर अनिधकृत बांधकामे सुरू आहे. वसई विरार मनपाच्या हद्दीत भूमाफिया कोणालाही न जुमानता, मनपाच्या अधिकाºयांशी साटेलोटे करून बिनधास्त अनिधकृत बांधकामे करतात असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे.काही अनधिकृत बांधकामे नाल्यावर किंवा नाले बुजवून सुद्धा केलेली आहे. राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामामुळे पोलीस स्टेशन व चौक्या, वसई विरार मधील आरटीओ कार्यालय आणि बस डेपो अशा प्रशासकीय कार्यालयांना जागेकरिता अच्छे दिनाची वाट पाहावी लागणार आहे. मनपाच्या सर्व प्रभागातील हद्दीमधील ५१ मार्केट झोन देखील या अतिक्रमणांपासून वाचलेले नाहीत. मनपा आयुक्तांनी वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय अधिकाºयाची कमतरता असल्याचे कारण देत आपला पल्ला झाडला आहे तर विविध प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर दररोज कारवाई केली जात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.राखीव भूखंडची माहिती देणारे बोर्ड धूळ खातायेतवसई विरार मनपाच्या प्रभागात भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, राखीव भूखंडाच्या बाबत माहिती सांगण्यासाठी बनविण्यात आलेले बोर्ड प्रभागाच्या वॉर्ड आॅफिसच्या परिसरात गंजून भंगार स्थितीत आहेत.राखीव भूखंडाकडे मनपाने लक्ष न देता जाणीवपूर्वक काणाडोळा केला तर अधिकाºयांनी आर्थिक साटेलोटे करून मदत केल्याने हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे राखीव भूखंडावर भूमाफियांनीकब्जा करून अनधिकृत इमारती उभ्या केल्याने खेळाची मैदाने, गार्डन, हॉस्पिटल, मार्केट, शाळा हे कागदावरच राहिलेआहे.राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे सुरू असतांनाच मनपाने कारवाई करण्याची हिम्मत दाखवली असती तर खेळण्यासाठी मैदाने, शाळा, हॉस्पिटल, मार्केट यांचे भूखंड माफियांच्या घशात गेले नसते.- राकेश सिंग, उपाध्यक्ष, नालासोपारा शहर, भाजपाकोणत्या राखीव भूखंडावर अनधिकृत बांधकामे आहेत ते दाखवून द्या. त्यांच्यावर रोज कारवाई करून ती तोडली जात आहेत.- सतिश लोखंडे, आयुक्त, वसई विरार महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे