शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:53 IST

भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत

पुणे: रंगभूमीवर ५८ वर्षांत ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी (वय ८४) यांचे शुक्रवारी (दि. २३) रात्री निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात त्यांची प्राणज्याेत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्या त्या पत्नी आणि राजा गोसावी यांच्या वहिनी होत.

भारती बाळ गोसावी-माहेरच्या दमयंती कुमठेकर. त्यांचा जन्म २२ जून १९४१ राेजी झाला. आई-वडिलांनाही नाटकाची आवड असल्याने अभिनयाचे बाळकडू घरातच मिळाले. त्याच बळावर त्यांनी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत. पूर्वी पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटके होत. घरी नाटकाचेच वातावरण असल्याचा लाभ घेत भारती यांनी १९५८ मध्येच सौभद्र नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरू. पदार्पणातच त्यांना छोटा गंधर्व यांच्याबरोबर काम करायला मिळाले. त्यानंतर भारती गोसावी यांनी मागे वळून पाहिले नाही. संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. वेगवेगळ्या नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किर्लाेस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे या दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली आहे. विविध एकांकिका स्पर्धांत त्या भाग घ्यायच्या. विजया मेहता तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी हाेत्या.

भारती गोसावी यांचे लग्न नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्याशी झाले. मोठे दीर राजा गोसावी हेही अभिनेते होते. त्यामुळे लग्नानंतरही भारती यांची नाट्य कारकिर्द चालूच राहिली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार, पराग आदी नाटक मंडळींच्या नाटकांत कामे केली. काशीनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीताची भूमिका केली. वयाची ७५ आणि रंगभूमीवर ५८ वर्षे पूर्ण केली म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद, मनोरंजन (पुणे) व भरत नाट्य संशोधन मंडळ या संस्थांतर्फे २०१६ मध्ये भारती गोसावी यांचा विशेष सत्कार झाला. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा २०१५ सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला हाेता.

गाजलेली पात्रे 

अती शहाणी (योजना), आम्ही रेडिओ घेतो (रंजना), कुणी गोविंद घ्या (प्रतिभा), कुर्यात् पुन्हा टिंगलम् (सूनबाई), कुर्यात् सदा टिंगलम् (सूनबाई - सुनीता देशपांडे, लीला बापट), खट्याळ काळजात घुसली (मिसेस कोटस्थाने), जळो जिणे लाजिरवाणे (सुशीला), तुझे आहे तुजपाशी (गीता), तू वेडा कुंभार (वंचा), दोघांत एक (स्मिता), धन आले माझ्या दारी (अंबिका; अहिल्या), नाही म्हणायचं नाही (आई; राणी), प्रेमा तुझा रंग कसा (बब्बड), बेबंदशाही, मंगळसूत्र, मला तुमची पप्पी द्या, माझा कुणा म्हणू मी (माधवी), मुजरा लोककलेचा (पाटलीणबाई), या सम हा (नटी-सूत्रधार), लग्नाची बेडी (अरुणा; गार्गी; यामिनी; रश्मी), वाहतो ही दूर्वांची जुडी (ताई), मानापमान संशयकल्लोळ (कृत्तिका), सुंदर मी होणार (बेबीराजे), सौभद्र (रुक्मिणी), क्षण एक पुरे प्रेमाचा आदी भूमिका रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ठरल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेartकलाNatakनाटकcinemaसिनेमाDeathमृत्यूSocialसामाजिक