शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:16 IST

गुन्हेगारी माेडून काढण्याचे आव्हान माेठे..... गावातील प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा; वाघाेलीकरांची अपेक्षा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाघाेली ...

गुन्हेगारी माेडून काढण्याचे आव्हान माेठे.....

गावातील प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा; वाघाेलीकरांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वाघाेली शैक्षणिक हब म्हणून विकसित झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण- तरुणींचा वावर माेठ्या प्रमाणात असताे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वाघाेलीतील विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे.

भूमाफीयांचा भूखंडांवर असलेला डाेळा लक्षात घेतला पाहिजे. त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण हाेणार आहेत. त्याशिवाय काेराेनाचा फटका बसलेल्या छाेट्या व्यावसायिकांच्या हितासाठी महापालिका काही करणार का, असेही विचारले जात आहे. गाव समाविष्ट हाेताना प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा, असे मत स्थानिकांकडून व्यक्त हाेत आहे.

“मोठ्या प्रमाणात टोळीयुद्धातून येथे गुन्हेगारी जन्माला आली आहे. दिवसाढवळ्या गावात हत्याकांड घडत होत असेल तर प्रशासन अजून कशाची वाट पाहत आहे? या ‘जंगलराज’ला कोण जबाबदार आहे,” असा संतप्त सवाल करत वाघोलीकरांनी महानगरपालिकेतील विलिनीकरणावर परखड भूमिका मांडल्या. पुण्यालगतच्या २३ ग्रामपंचायतींचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या गावांमधील नागरिकांचे प्रश्न आणि भूमिका समजून घेण्यासाठी ‘लोकमत’ने मोहीम हाती घेतली आहे.

वाहतूककोंडी ही वाघोलीची डोकेदुखी असली तरी गावातील टोळीयुद्धावर कोण बोलणार, असा सवाल तरुणाई करते. नाव न सांगण्याच्या अटीवर वाघोलीतील तरुणाईने ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या. वाघोलीत नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण वाढल्याने झपाट्याने गावाचा विकास झाला. त्याच वेगाने गावात गुन्हेगारीही फोफावली. यातून निर्माण झालेली अस्वस्थता आणि बिघडलेली सुरक्षाव्यवस्था याला आळा घालणे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला कठीण झाले आहे. या टोळीयुद्धात सर्वसामान्यांचा बळी जात असून याचा परिणाम वाघोलीत येणाऱ्या गुंतवणुकीवर होईल, असे वाघोलीकरांना वाटते.

“नोकरी करणाऱ्या महिलांना रात्रीची शिफ्ट असते. अशा वेळी महिलांना सुरक्षा कोण देणारॽ वाघोलीचा समावेश महापालिकेत झाला तरी आम्ही निडरपणे रात्रबेरात्री फिरू शकणार आहोत का,” असा प्रश्न वाघोलीतील सर्वसामान्य महिलांनी उपस्थित केला. कोरोना टाळेबंदीत लघुउद्योगांवर घाव बसला. छोटे व्यावसायिक आर्थिक तोटा सहन करून बेरोजगार झाले. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मग अशा वेळी सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतीने नागरिकांना आणि नुकसानपीडित लघुउद्योगधारकांना का मदत केली नाही, असा प्रश्न येथील छोट्या व्यावसायिकांनी विचारला.

तीनशे एकरचे क्षेत्र गायरानाखाली असताना आम्हा तरुणांना खेळण्यासाठी मैदान कुठे आहेॽ लोहगाव रस्त्यावर क्रीडांगणासाठी जागा सोडली होती. त्यावरही आता भूमाफियांचा डोळा आहे. महानगरपालिकेने आम्हाला खेळण्यासाठी सुसज्ज मैदान द्यावे, अशी मागणी तरुण करतात. राज्य शासन आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण प्रकल्प राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित करतात पण झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब वाघोलीकरांचे काय, असाही प्रश्न आहे.

कोट

गुन्हेगारी हा जरी मुद्दा संवेदनशील असला तरी मागील काही काळापासून गावातील गुन्हेगारी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. अर्थात प्रशासनाची जबाबदारी कमी झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

- नोकरदार महिला.

.......

पाण्याची टंचाई असून नागरिकांना पाणी मिळत नाही. गाव महानगरपालिकेत गेले तर निदान वेळेवर पाणीपुरवठा होईल, अशी आशा आहे.

- व्यावसायिक.

......................

वाघोली मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. अफाट शहरीकरणामुळे गावाचं सौंदर्य नाहीसं होऊन वाघोली बकाल होऊ नये. लवकरात लवकर महानगरपालिकेत विलीनीकरण व्हावे!

- महाविद्यालयीन विद्यार्थी.

......

फोटो आहे