शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Updated: July 10, 2015 01:49 IST

कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन...

जयंत देशमुख : कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून धान लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात दुप्पट वाढ होण्यास मदत होईल. माती परीक्षण करून खतांचा समतोल वापर तसेच जैविक कीटकनाशके यांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत आत्माचे राज्य संचालक जयंत देशमुख यांनी व्यक्त केले.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे कृषी जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक पुणेचे धुमाळ, त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे व तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, चिंतामन बिसेन, भोजराज पटेल यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील ३०० च्या वर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संचालन कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. $$्निेकाचेवानी : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात कृषी जागृती सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, खंड विकास अधिकारी नारयण जमईवार, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात पी.व्ही. पोटदुखे यांनी, शासनाच्या विविध कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, खरीप हंगाम १५-१६ करिता एम किसान पोर्टल नोंदणी, शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणे, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नगदी पिकांकरिता क्षेत्रात वाढ करणे, बीज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, श्रीपद्धत, कमी खर्चाची शेती, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व पाण्याचे महत्त्व यावर मोहीम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर त्यासाठी सभा होत आहेत, असे सांगितले. या वेळी प्रवीण महिरे, एन.आर. जमईवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी/वार्ताहर)