शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; शेती पिकांचे अतोनात नुकसान, हजारो शेळ्या - मेंढ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 7:58 PM

शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३५ शेळ्यामेंढ्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३४ शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. तर काही ठिकाणी मोठी जनावरे देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात शेतीपिकाला प्रचंड फटका बसला आहे. द्राक्षबागाबरोबरच लागवडीला आलेले कांद्याची रोप भुईसपाट झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू, हरभरा व अन्य सर्व कडधान्य वाय गेल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही ठिकाणी घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड देखील झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यात शेळा-मेढ्यांचे तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज 

तालुका      गाव      शेळ्यामेंढ्या (मृत्यू) आंबेगाव    10           169शिरूर        05           109खेड           04             73जुन्नर         15         541हवेली        02             17भोर           1               02मावळ       02            36बारामती     06          40दौंड           03            24पुरंदर         07          119

टॅग्स :zpजिल्हा परिषदPuneपुणेRainपाऊसWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी