शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आॅनलाईनला परीक्षेला प्राधान्य? कुलगुरूंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:28 PM

परीक्षेआधी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणार

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चाचपणी सुरू केली आहे. विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पध्दतीचा वापर करून यशस्वीपणे आॅनलाईन प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत. याच पध्दतीचा वापर करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाकडून पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. परीक्षांचे नियोजन करताना इतर पर्यायांचाही विचार केला जाईल, असे स्पष्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, युजीसीने घालून दिलेले ३० सप्टेंबरचे बंधन न्यायालयाने ठेवलेले नाही. या निकालामुळे राज्यात परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने विद्यापिठाने यापुर्वीच तयारी केली आहे. पण सध्याच्या कोरोनाची स्थिती बिकट असल्याने विविध पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. याबाबत डॉ. करमळकर यांनी परीक्षांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. विद्यापीठाकडून यापुर्वी परीक्षा घेण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे पुन्हा ठराव करावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.विद्यापीठाकडून आधीपासून परीक्षांची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांना सुमारे १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यामध्ये काहीही अडचणी आल्या नाहीत. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठीही या पध्दतीचा वापर करण्यास पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊनच परीक्षांच्या वेळा निश्चित केल्या जातील. किमान दीड महिन्यांचा कालावधी असेल. आॅनलाईनप्रमाणेच अन्य पर्यायांचाही विचार केला जाईल. त्यानुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरेल, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले. ----------------शाखानिहाय अंतिम वर्षातील परीक्षार्थीकला - ३५ हजार १६७शिक्षण शास्त्र - ६ हजार २३२विज्ञान -४० हजार ३५४विधी -७ हजार २२५वाणिज्य- ६६ हजार ८६३व्यवस्थापनशास्त्र -१४ हजार ९०६औषधनिर्माणशास्त्र - ५ हजार २०९अभियांत्रिकी - ४८ हजार १३६आर्किटेक्चर - १ हजार ३७२------------------------------प्रॉक्टर्ड परीक्षा पध्दतीमध्ये एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा देता येते. यामध्ये परीक्षेची वेळ निश्चित असते. विद्यार्थ्यांची ओळख पटवता येते. परीक्षा केंद्राप्रमाणे इथेही विद्यार्थ्यांवर परीक्षेदरम्यान लक्ष ठेवता येते. विद्यापीठाने याच पध्दतीने यशस्वीपणे यंदा प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत. ------------सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थीपुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी अंतिम वर्षातील आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाला करावे लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६६ हजार विद्यार्थी वाणिज्य शाखेतील तर ४८ हजार अभियांत्रिकी शाखेचे आहेत. विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ४० हजार व ३५ हजार एवढी आहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय