शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:18 IST

राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच, पण संपूर्ण देश राणेंच्या पाठीशी असणार

ठळक मुद्देकॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपा-शिवसेनेची मैत्री तोडण्याचे काम केले

पुणे : “राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. त्यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे,” असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांना अटक ही दंडेलशाहीची देशातली पहिलीच घटना असून, राष्ट्रीय नेते अमित शहा यांनीही राणे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. 

“राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने सरकारने त्यांना अटक केली. याची कायदेशीर लढाई भाजपा पूर्ण ताकदीने लढेल. राणे यांच्या शैलीमुळे भाजपाची कोणतीही फरपट होत नसून ते पक्षाचे ‘ॲॅसेट’ आहेत,” असे पाटील म्हणाले. “कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपा-शिवसेनेची मैत्री तोडण्याचे काम केले. आता आमच्यात वैर निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत,” असे सांगून ते म्हणाले की, राज्यातले भाजपा खासदार लोकसभा अध्यक्षांकडे हक्कांवर गदा येत असल्याप्रकरणी तक्रार करणार आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, राणे यांची बोलण्याची एक शैली आहे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रघात आहे. विरोधक त्यांना उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय मंत्र्यांना थेट अटक म्हणजे राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारला सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाण्याची सवय आहे. राणेंच्या अटकप्रकरणी हेच होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले हे चालते का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्यपाल राज्याचे संविधानिक प्रमुख असतात. त्यांना उद्देशून ‘म्हातारा’, ‘वय झाले’, ‘विसरतो’ असे एकेरी उल्लेख करता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काठ्या-लाठ्या, तोडू-फोडू अशा किती हिंसक शब्दांचा वापर होतो, बडवलं पाहिजे असं म्हणता. ते चालतं का? असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील याचा विचार करावा. “विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पदानुसार पक्षविरहित भूमिका आवश्यक आहे. पण सातत्याने त्या पक्षीय भूमिकेतून बोलत आहेत. त्यांची विधाने आणि लेखांच्या आधारे लवकरच त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल,” असेही पाटील म्हणाले.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची

“भाजपाच्या नाशिक येथील कार्यालयावरील हल्ला भ्याड आहे. शब्दांची लढाई शब्दांनीच करावी. असे लांबून दगड मारणे भ्याडपणा आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. शिवसेना कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

समज देऊन मिटले असते

“नारायण राणे यांच्या आक्रमकतेमुळे भाजपाची प्रतिमा बिघडत नाही. ते काहीही चुकीचे करत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राणेंचा स्वभाव अन्याय सहन न करण्याचा ‘जशास तसे’, ‘ठोशास ठोसा’ असा आहे. भाजपाचीही शैली ‘आक्रमक पण नम्र, आपल्या मुद्याशी ठाम’ ही आहे. राणेंच्या वक्तव्यानंतर सरकारला त्यांना समज देऊन हे प्रकरण मिटवता आले असते,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना