शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 5:22 PM

उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत.

ठळक मुद्देभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पळसदेव : तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के झाले आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून उजनीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बुधवारी (दि. २२आॅगस्ट) दुपारपर्यंत उजनी धरण ७२ टक्के झाले होते.उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, बॅकवॉटरलगतचा शेतकरी खूष आहे. बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५००  क्युसेक, तर बंडगार्डन येथून  ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप काढून घ्यावेत, तसेच नदीपात्रातून बंधाऱ्यावरून दळण -वळण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने सोलापूर, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी (मुलकी) ता. माढा व बारामती. तसेच इंदापूर, माढा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर येथील तहसीलदार यांना प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरणSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगरPuneपुणे