शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उजनीची पाणी पातळी निम्म्यावर..! धरणात ५३.१२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:16 IST

सोलापूरसाठी दुसरे आवर्तन सोडल्याने शेतकरी चिंतीत.

- तुषार हगारेभिगवण :पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यामध्ये धास्ती भरली आहे. गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, या वर्षीही पुनरावृत्ती होईल ?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी जलाशयातून दुसरे आवर्तन सोडले असल्याने पाणी पातळीत वेगाने घट होत आहे.चालू वर्षी उजनी धरण १११ टक्के भरले होते. डिसेंबर महिन्यात पहिले आवर्तन सोडले, यामध्ये ५ टीएमसी नदीमधून सोडले आणि १७ फेब्रुवारीपासून दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. तसेच, कालव्यातून झालेली आवर्तन वेगळीच आहेत. आणखीन आता पुढे १० मार्च च्या पुढे एक आवर्तन होईल. सोलापूर जिल्ह्याच्या शेतीला या पाण्याची आवश्यकता आहेच हे कोणीही नाकारत नाही. उपसा सिंचन योजना यासुद्धा चालल्या पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा जगाला पाहिजे. मात्र, ज्या पद्धतीने पाणी जाते आणि त्याचा उपयोग किती होतो व कोणाला होतो. हा विषय संशोधनाचा आहे. यावर पुणे जिल्ह्यातील पुढारी अगदी झोपेत आहेत की, झोपेचे सोंग घेऊन बसलेत, हे मात्र कळायला मार्ग नाही.उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णतः उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.धरणाची पाणी पातळी ५३ टक्क्यांवर आली आहे. यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापुढील काळात पाणी कपातीची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते. कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीरपणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून, दोन महिन्यांत ५० टक्के पाणी संपलेले असून, नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजामध्ये प्रवेश करेल. उजनीत बुडीत बंधारे कधी होणार ?पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास पाणी पातळी खालावल्यास शेतकरी वर्गासह पाणी वापर संस्थाना पाणी वापरण्यासाठी बुडीत बंधारे वरदान ठरतील निवडणुकांच्या काळात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, बुडीत बंधाऱ्याची निर्मिती कधी होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना तहान लागल्यावर भेडसावतो.   

सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदी वाटे पाणी सोडण्याच्या पद्धती मुळे २५ ते ३० टीएमसी पाणी अनाठायी वाया जाते. त्यामुळे सोलापूर शहराला पाणीपुरववठा करण्याकरिता तयार होत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी. - प्रा. शिवाजीराव बंडगर उजनी धरण संघर्ष समिती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातAgriculture Schemeकृषी योजना