शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:25 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली...

पुणे : भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेशरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची १० वाक्यांचे जाहीर वाचन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी झालेल्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे तसेच पक्षाचे केंद्र तसेच प्रदेश पातळीवर अनेक नेते उपस्थित होते.

फडणवीस यांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘वज्रमूठबद्दल काय बोलणार? वज्रमूठचा निर्माता असलेले शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात वज्रमूठचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा, असे सांगून फडणवीस यांनी त्या पुस्तकातील १० वाक्येच वाचून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘पवार म्हणाले, तेच आम्ही म्हणत होतो, तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले.’

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘त्या निकालानंतर तरी त्यांना जाग येईल, असे वाटले होते. तसे झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी ८ मागण्या केल्या होत्या. त्या मागण्याही फडणवीस यांनी वाचून दाखवल्या, प्रत्येक मागणीनंतर ते न्यायालयाने हे मान्य केले का? असा प्रश्न विचारून प्रेक्षागृहातील भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नाही’ सामूहिकपणे म्हणून घेत होते. ‘असे असूनही ते म्हणतात गावोगाव निकाल सांगू. सांगा, बडवा! आमच्या बापाचे काय जाते! सरकार पूर्ण घटनात्मक आहे. न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे. हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पुन्हा निवडून येईल,’ असा दावा फडणवीस यांनी केला व त्यावरही कार्यकर्त्यांकडून टाळ्या घेतल्या.

फडणवीस यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. ‘मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे,’ असे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टीआरपी कसा खेचावा यासाठी शरद पवारांचा क्लास लावावा, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. ‘खंडणीखोरांपासून दाऊदशी संबंध असलेला मंत्रिमंडळात होता. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षांत केवळ काही तास आपण मंत्रालयात बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितले. पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणारं कांडही आपण पाहिलं. एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी फिरवणारा,’ अशी त्यांनी भाकरी फिरवावी लागते यावर कोटी केली.

पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.

- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.

- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती

- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.

- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.

- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.

- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.

- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु, ऑनलाइन पद्धतीने.

- दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.

- उद्धव ठाकरेंचं फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे