शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नाट्यव्यवसायाला दोन कोटींचा फटका; कोरोनानंतर तरी प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:01 IST

गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच रंगभूमी बालनाटकांपासून वंचित राहणार

ठळक मुद्देनाट्यनिर्माते, कलाकार, दिगदर्शक यांच्यापासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत मोठी टीम कार्यरत मार्चमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल आणि मे महिने नाटकांच्या दृष्टीने सुगीचे दिवस

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नाट्यव्यवहाराचे कमालीचे नुकसान झाले असून, भविष्यातील चिंतेने निमार्ते, दिगदर्शकांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सर्वच जण भांबावले आहेत. एका महिन्यात नाट्यव्यवसायाचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच रंगभूमी बालनाटकांपासून वंचित राहणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे संकट टळले तरी प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.    मुंबईनंतर पुणे ही व्यावसायिक नाटकांची पंढरी समजली जाते. सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरातील नाट्यरसिकांचा मोठा वर्ग आहे. रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यनिर्माते, कलाकार, दिगदर्शक यांच्यापासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत मोठी टीम कार्यरत असते. कोरोना विषाणूच्या उद्रेकाने या संपूर्ण वतुर्ळाचे कंबरडे मोडले आहे. अचानक आलेल्या या संकटाने सर्व जण भांबावले आहेत. मनोरंजनाची साधने बदलल्यामुळे आधीच नाटकांकडे वळणारा प्रेक्षकवर्ग गेल्या काही वर्षात कमी झाला आहे. त्यातच कोरोनाच्या संकटाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होण्यास सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे आर्थिक फटका कसा भरून काढायचा, या चिंतेने नाट्यवतुर्ळाला व्यापले आहे.मार्चमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल आणि मे महिने नाटकांच्या दृष्टीने सुगीचे दिवस मानले जातात. या काळात नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढते, नवीन नाटके रंगमंचावर येतात. बालनाटकांसाठी तर हा हक्काचा कालावधी असतो. बालरसिकांसाठी या काळात येणारी नाटके म्हणजे पर्वणीच असते. मात्र, यंदा हा काळ कोरोनाने ग्रासला असल्याने रंगभूमी बालनाट्याला मुकली आहे. गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली आहे. व्यावसायिक नाटकांचे पुण्यात या काळात महिन्याला सात-आठ प्रयोग होतात. बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे नाटकांचे सर्वाधिक प्रयोग होतात. प्रत्येक नाटकामागे दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण नाट्यसृष्टीला दोन कोटींचा फटका बसला आहे.-----कोरोनाच्या संकटानंतर तरी प्रेक्षक नाट्यगृहांकडे वळणार का?कोरोनाचे संकट टळून नाट्यगृहे खुली होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजडणार आहे. मात्र, लोकांच्या मनातील भीती मात्र एवढ्यात कमी होणारी नाही. त्यामुळे तिकिटांचे दर कमी करून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नाट्यगृहे खुली केली तरी प्रेक्षक नाट्यगृहांकडे वळतील का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.-----या काळात रंगभूमीवर नवीन नाटके येतात. पावसाळयापर्यंत नाटकांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभतो. मात्र, आता कोरोनाने आर्थिक चक्र उलटे फिरवले आहे. बालनाटके तर यंदा रंगभूमीवर येणारच नाहीत. पडद्यामागील कलाकारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यांचा रोजगार बुडाल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यसृष्टीतील काही मंडळी एकत्र येऊन निधी उभारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या संकटाने कोट्यवधीचे नुकसान केले असून, परिस्थिती पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल, ते सांगता येणार नाही.- सुनील महाजन -----एप्रिल-मे महिना हा नाटकांच्या दृष्टीने चांगला हंगाम असतो. या काळात बालनाट्ये, मराठी संगीताचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. मात्र, यंदा अचानक उदभवलेल्या संकटाने सर्व आर्थिक गणित मोडीत काढली आहेत. पडद्यामागील कलाकारांची अपरिमित हानी झाली आहे. मनोरंजन ही जीवनावश्यक गरज नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात तरी नुकसान भरून निघेल का, याबाबत साशंकता आहे.- प्रवीण बर्वे

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस