शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पार्किंग धोरण अडचणीत; पाच रस्ते निवडणार कसे? वाहतूक पोलीसही अनभिज्ञच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 5:33 AM

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी रात्री तब्बल दीड वाजता वाहनतळ धोरणाचा प्रस्ताव दुरुस्तीच्या उपसूचनेसह मंजूर करून घेण्यात आला. तरीही त्यासाठी दिलेली उपसूचना मोघम असल्यामुळे या धोरणासमोर पुन्हा अडचणीच उभ्या राहण्याची चिन्हे आहेत.

पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी रात्री तब्बल दीड वाजता वाहनतळ धोरणाचा प्रस्ताव दुरुस्तीच्या उपसूचनेसह मंजूर करून घेण्यात आला. तरीही त्यासाठी दिलेली उपसूचना मोघम असल्यामुळे या धोरणासमोर पुन्हा अडचणीच उभ्या राहण्याची चिन्हे आहेत. कोणते पाच रस्ते, हे त्यात स्पष्ट झालेले नाही तसेच वाहतूक शाखा व पोलीसही या धोरणाबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसते आहे.रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रात्रीचे तसेच दिवसाचेही व तेही दरताशी शुल्क या धोरणानुसार लावले जाणार आहे. त्याला फार मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे व त्यातही खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक सहभागी असल्यामुळे पदाधिकाºयांना या धोरणापासून थोडे मागे येणे भाग पडले. त्यानुसार ठरावात दुरुस्तीची उपसूचना मांडण्यात आली. त्यानुसार आता फक्त ५ रस्त्यांवर प्रायोगिक स्तरावर हे धोरण राबवण्यात येईल. सहा महिने धोरणाचा अभ्यास करण्यात येईल. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेते व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल.पाच रस्त्यांची नावे निश्चित झालेली नाहीत. पाच प्रमुख रस्ते ठरवले तर मग त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता घेणार का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपसूचनेत नाही. समितीत कोणते तज्ज्ञ असणार, ते काय अभ्यास करणार, याविषयीही कोणाला काही माहिती नाही.समिती कशासाठी लागते ?वाहनतळासाठी मोकळ्या जागा शोधण्याचा प्रयत्न समिती करणार आहे. त्यासाठी समिती कशाला हेही स्पष्ट होत नाही. आताही प्रशासनासमोर अनेक मोकळ्या जागा आहेत. सोसायट्यांची मोकळी जागा (अ‍ॅमेनिटी स्पेस) सोसायट्या वाहनतळासाठी वापरू देणार आहे का, असाही उपप्रश्न यातून निर्माण होतो. शहराच्या मध्यभागात तर मोकळ्या जागांची वानवाच आहे. मग वाहनतळासाठी जागा शोधणार कुठे? असा सवाल नगरसेवकांकडून होत आहे.धोरण तयार केले त्या वेळी त्यात वाहतूक शाखेच्या तसेच सर्वसाधारण पोलिसांना त्याची माहिती द्यायला हवी होती. सध्या तरी महापालिकेकडे शहरातील पार्किंग झोनची काहीच माहिती उपलब्ध नाही. वाहनतळ, पी वन-पी टू याची काहीच माहिती नसताना धोरण तयार कसे करण्यात आले, असा प्रश्न विरोधकांकडून केलाजात आहे.चर्चा इतकी लांबली की आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांना अगदी सहजपणे खुर्चीवरच डुलकी लागली. तेच नाही तर सभागृहातही पहिल्या बाकावरचे कर्णे गुरुजी तसेच मागील बाकांवर बसणाºया काही नगरसेवकांनाही थोडा वेळ डुलकी लागली होती. धोरणात बदल करावा लागल्याची खंत आयुक्तांच्या चेहºयावर स्पष्ट दिसत होती.उपसूचना मांडल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यावर दीड वाजेपर्यंत भाषणे सुरू होती. भाजपा सत्तेत आल्यानंतरच पुणेकर बेशिस्त वागायला लागले आहेत का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी, आम्हाला विकास करायचा आहे, त्यासाठीच काम करतो आहोत. त्यासाठी विरोधकांनी श्रेय घेऊ नये असे म्हणाले. रात्री उपसूचनेचा समावेश करून दुरुस्तीसह या धोरणाचा प्रस्ताव मंजूर झाला.

टॅग्स :Puneपुणे