शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जवानांच्या निवृत्तिवेतनात गोंधळ

By admin | Updated: May 11, 2015 06:21 IST

सेवानिवृत्त जवानांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण मंडळाच्या निवृत्तिवेतन विभागाकडून सध्या २००६ पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांच्या वेतनामध्ये झालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुणे: सेवानिवृत्त जवानांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण मंडळाच्या निवृत्तिवेतन विभागाकडून सध्या २००६ पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांच्या वेतनामध्ये झालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील ५० हजार सेवानिवृत्त जवान व जवानांच्या पत्नी यांच्या निवृत्तिवेतनामध्ये गोंधळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे.जवानांच्या निवृत्तिवेतनाबाबत २००९ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री यांनी राज्यसभेत १९ लाख निवृत्तिवेतन धारक जवानांपैकी केवळ ३ लाख निवृत्तिधारकांना योग्य निवृत्तिवेतन मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर या गोष्टीला खऱ्या अर्थाने वाचा फुटली होती. त्या वेळी बुलडाणा जिल्ह्यातील निवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी तत्काळ स्थानिक स्तरावरून चौकशी सुरू केली. सेवानिवृत्त जवान व जवानांच्या विधवा पत्नी यांना योग्य निवृत्तिवेतन दिले जावे यासाठी सैनिक कल्याण मंडळाने २०१३मध्ये निवृत्तिवेतन विभागाची स्थापना करण्यात आली. हा विभाग देशातील एकमेव निवृत्तिवेतन विभाग असून सुहास जतकर हे मंडळाचे संचालक आहेत.सुहास जतकर म्हणाले, की आम्ही शहीद जवानांच्या विधवा पत्नींना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनाची चौकशी केली केली. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील १३ जवानांच्या पत्नींना योग्य निवृत्तिवेतन दिले जात नसल्याचे दिसून आले. दुसऱ्या जिल्ह्यामध्येसुद्धा निवृत्तिवेतनामध्ये गोंधळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर आम्ही काही दुर्गम भागातील गावांमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त जवानांशी संपर्क साधला असता, त्यांच्या निवृत्तिवेतनामध्येही असलेली विसंगती दूर केली.निवृत्तिवेतन विभागाचे ग्रुप कॅप्टन सुहास पाठक (निवृत्त) म्हणाले, की आम्ही निवृत्तिवेतनासाठी काही नियमावली निश्चित केली आहे. निवृत्तिवेतन समन्वयक योग्य पद्धतीने अर्ज भरला आहे की नाही याची तपासणी करतो. त्यानंतर पुण्यातील सैनिक कल्याण मंडळाकडे पाठवून पुढील कार्यवाही करतो.