शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

'पुलं'च्या मालती माधवमध्ये दिग्गजांचा स्नेहमेळावा, तीन पिढ्यांनी साधला मुक्त संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 00:02 IST

पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गणगोत' मालती-माधव मध्ये जमले.

पुणे - पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गणगोत' मालती-माधव मध्ये जमले. 'गुण गाईन आवडी' या भावनेतून सर्वांनीच त्यांच्या मोतीरूप आठवणींची माळ गुंफली.

भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीतील निवासस्थानी पु़ ल व सुनिताबाई असताना साहित्यिक, संगीतकार, चित्रकार, गायक, वादक यांचा गणगोत जमत असत.सध्या हे घर बंद असल्याने अशा मैफिल बंद झाल्या होत्या. पु़ल़ देशपांडे याच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी सर्वांना एकत्र यावे, या हेतून ‘आशय’ च्या वतीने स्रेहमेळाव्याचे आयोजन केले होते.  तीन पिढ्यांच्या प्रतिसादाने मंगळवारी मालती माधव पुन्हा एकदा गजबजून गेलेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, शि. द. फडणीस, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माधव वझे, अरुणा ढेरे, प्रा़ मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, गायक राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, सावनी शेंडे, प्रकाशक दिलीप माजगावकर, ज्येष्ठ पत्रकार मुंकुंद संगोराम, राम कोल्हटकर, डॉ़ सुधीर लोहकुरे, डॉ़ आशुतोष जावडेकर, शुभदा मोघे, डॉ़ सतीश देसाई, रेखा साने इनामदार, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आदि उपस्थित होते. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर व ज्योती ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले.

पु. ल. देशपांडे यांना अनेकांनी आपल्या कलाकृती भेट दिल्या आहेत. त्यांच्या घरात लावलेली चित्रे  आर्वजून पहात शि. द. फडणीस यांनी त्याविषयीची माहिती सांगितली. पु़ लंचे रवींद्रनाथ टागोर, चॉली चॅप्लीन आणि जॉर्ज बनार्ड शॉ हे दैवत होते. त्यांची छायाचित्रे हॉलमध्ये अजूनही तशीच ठेवण्यात आली आहेत. त्यावर या मान्यवरांनी आपले अनुभव सांगितले. निलकांती पाटेकर यांनी भार्इंना चॉली चॅप्लीनचे कोलाज करुन पाठविले होते. सुनिताबार्इंनी हे सांगितल्याचे सांगून ज्योती ठाकूर म्हणाल्या, एकदा मुंबईत जाऊन निलकांती हिची भेट घेतल्यावर तिने पहिल्यादा ते कोलाज जपून ठेवले आहेत ना असे विचारुन सांगितले की मी दोनच कोलाज केले होते. त्यातील एक भार्इंना दिले आणि दुसरे अमिताभ बच्चन यांना. 

मिरासदार यांच्याशी बोलताना दिनेश ठाकूर यांनी सांगितले की, मला तुमच्या चोरीची कथा आठवली. येथेही दोनदा चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावर त्यांनी इथं चोरण्यासारखे काय आहे, अशी मल्लीनाथी केली. प्रा. मिलिंद जोशी यांनी सरकारी कथाकथनाचा द. मां.चा किस्सा सांगितला. सरकारी योजनाच्या प्रसारासाठी कथाकथनाचा कार्यक्रम होता़ त्यात दादांनी (द़ मा़) यांनी माझी चोरी ही कथा ऐकवली. माझे पैसे सरकारी योजनेत गुंतवले असते तर चोरी झाली नसती, असे सांगून सरकारी योजनेची जाहिरात केल्याची आठवण सांगितली.

 द. मा. म्हणाले, भार्इंना मी एकदा म्हणालो होते की, आम्हाला ही सुचते पण जरा उशिरा.

अनिल अवचट यांनी पु.ल. यांना एक ओरीगामी दिले होते. तेही जपून ठेवल्याचे दिनेश ठाकूर यांनी त्यांना दाखविले. त्यावर रामदास फुटाणे यांनी हे अगोदर पुरोगामी होते की ओरीगामी होते, असा प्रश्न केला. त्यावर हसत प्रतिसाद देताना अवचट यांनी मी दोरीचे खेळ करत असल्याने आता लोक मला दोरीगामी म्हणतात असे सांगितले.

निवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्य

पुलंचे भाचे दिनेश ठाकूर व ज्योती ठाकून हे अमेरिकेत असतात. वर्षातून २ महिने पुण्यात येतात. पु़ ल़ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा वारंवार पुण्यात येणे होणार आहे. त्यानंतर निवृत्तीनंतर पुढील वर्षी पुण्यात स्थायिक होणार असून, येथेच राहणार आहेत. भाई आणि सुनिताबार्इंचे हे घर त्यावेळी जसे होते तसेच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे दिनेश ठाकूर यांनी सांगितले.

पुलंविषयी नितांत आदर असलेले दोन मुले आज सकाळीच मालती माधवमध्ये आले होते. त्यांनी अगोदर पाय धूवून येऊ का असे विचारले. पाय धुवून त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर बोलताना त्यांनी सुनिताबाईंनी लिहिले तसे भाई आळशी होते का अशी निरागसतेने चौकशी केली. तेव्हा ठाकूर यांनी सांगितले की, तालमी असताना ते कधीही आळस करीत नसत. 

पुल़ यांच्या एक झुंज वा-याशी या नाटकातील मुख्य भुमिका मी केली होती. त्याचे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते. ते दाखविण्यासाठी मी पुलंना भेटायला गेलो होतो. त्यावेळी ते मुंबईतील एनसीपीएचे संचालक होते. त्यांनी ते पारितोषिक पाहून दिलेली शाबासकी माझ्यासाठी लाखमोलाची आहे,असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीnewsबातम्या