शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:49 IST

पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती

पुणे : गेल्या चार दिवसांपासून पावसाने उत्तर भारतात कहर माजवला आहे. परिणामी हिमाचल प्रदेशात मोठी हानी झाली आहे. या अतिवृष्टीत हजारो पर्यटक अडकले असून, त्यात पुण्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून, दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमधील सहा पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी स्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासन हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.’ हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील सहा जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. कुलूमध्ये असताना रविवारी त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर संपर्क झाला नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या सहा पर्यटकांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील बनोटे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही हिमाचल प्रदेश सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांनीही याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते व पूल बंद केले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दळणवळण सुरू होईल. त्यानंतर तेथून पर्यटक बाहेर पडू शकतील. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनही हिमाचल सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मुंबईतून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नातेवाइकांनी घाबरू नये

पुण्यातील पर्यटकांची माहिती हिमाचल प्रदेश सरकारला कळविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. सर्वजण सुरक्षित असून, नातेवाइकांनी घाबरू नये. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊसtourismपर्यटनenvironmentपर्यावरण