शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:49 IST

पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती

पुणे : गेल्या चार दिवसांपासून पावसाने उत्तर भारतात कहर माजवला आहे. परिणामी हिमाचल प्रदेशात मोठी हानी झाली आहे. या अतिवृष्टीत हजारो पर्यटक अडकले असून, त्यात पुण्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून, दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमधील सहा पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी स्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासन हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.’ हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील सहा जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. कुलूमध्ये असताना रविवारी त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर संपर्क झाला नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या सहा पर्यटकांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील बनोटे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही हिमाचल प्रदेश सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांनीही याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते व पूल बंद केले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दळणवळण सुरू होईल. त्यानंतर तेथून पर्यटक बाहेर पडू शकतील. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनही हिमाचल सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मुंबईतून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नातेवाइकांनी घाबरू नये

पुण्यातील पर्यटकांची माहिती हिमाचल प्रदेश सरकारला कळविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. सर्वजण सुरक्षित असून, नातेवाइकांनी घाबरू नये. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊसtourismपर्यटनenvironmentपर्यावरण