शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:49 IST

पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती

पुणे : गेल्या चार दिवसांपासून पावसाने उत्तर भारतात कहर माजवला आहे. परिणामी हिमाचल प्रदेशात मोठी हानी झाली आहे. या अतिवृष्टीत हजारो पर्यटक अडकले असून, त्यात पुण्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून, दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमधील सहा पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात असताना पावसामुळे रस्ते बंद असल्याने मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी स्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासन हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.’ हडपसरमधील मगरपट्टा सिटीतील एका खासगी कंपनीतील सहा जण हिमाचलमधील कसोल येथे अडकले आहेत. कुलूमध्ये असताना रविवारी त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर संपर्क झाला नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या सहा पर्यटकांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. हिमाचलमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील बनोटे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही हिमाचल प्रदेश सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांनीही याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते व पूल बंद केले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर दळणवळण सुरू होईल. त्यानंतर तेथून पर्यटक बाहेर पडू शकतील. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनही हिमाचल सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने मुंबईतून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नातेवाइकांनी घाबरू नये

पुण्यातील पर्यटकांची माहिती हिमाचल प्रदेश सरकारला कळविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. सर्वजण सुरक्षित असून, नातेवाइकांनी घाबरू नये. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊसtourismपर्यटनenvironmentपर्यावरण