शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

अपघातांबाबत टोलवाटोलवी, बीआरटी मार्गातील संख्या वाढली, एकही अपघात झाला नसल्याचा पीएमपीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:29 AM

सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे.

- राहुल शिंदेपुणे : सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे, तर अपघातांची जबाबदारी पालिका प्रशासनाची नाही तर पीएमपीची आहे, असे उत्तर पालिकेच्या अधिका-यांकडून दिले जात आहे.संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गातून सर्रासपणे खासगी वाहने जात आहेत. त्यातही संगमवाडी ते सादलबाबा चौक या बीआरटी मार्गातून सर्वाधिक दुचाकी व चारचाकी वाहने जातात. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारचाकी गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या समोरूनही खासगी वाहने बीआरटी मार्गातून जात होती. बीआरटी मार्गातून पीएमपी बसव्यतिरिक्त इतर वाहनांनी जाणे बेकायदेशीर आहे. खासगी वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीने बीआरटी मार्गांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. परंतु, सुरक्षारक्षकांशी वाद घालून; काही वेळा हाणामारीवर उतरून चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात घुसत आहेत. एकाही वाहनावर कारवाई होत नसल्याने दररोज बीआरटीतून जाणाºयांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नाही, असा दावा पीएमपीच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच पालिका प्रशासनाने यात सहकार्य करावे, अशी अपेक्षा काही अधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.बीआरटी परिसराजवळ राहणारे काही नागरिकच दररोज या मार्गातून जात आहेत. तसेच बीआरटीत घुसणाºयांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिव्या खाव्या लागतात. काही वाहनचालकांनी तर सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत.बीआरटीतून जाणाºया वाहनांचे क्रमांक सुरक्षारक्षकांकडून नोंदविले जातात. परंतु, एकाही वाहनचालकावर कारवाई होत नाही. ट्रक, टेम्पो, स्कूल बस, पाण्याचा टँकर, एसटी बस यांसह पोलिसांची वाहनेसुद्धा बीआरटी मार्गातून जातात. त्यामुळे कारवाई कोण कोणावर करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.बीआरटी मार्ग केवळ ‘बस’साठी आहे. त्यासंदर्भातील फलक पालिकेकडून बीआरटी मार्गावर लावण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियमन करणे हे पालिकेचे नाही तर पीएमपीचे काम आहे.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महानगरपालिका, पुणेबारआरटी मार्गातून केवळ बस जाणे, अपेक्षित आहे. या मार्गातून जाणा-या इतर खासगी वाहनांवर पोलिसांच्या मदतीने नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जाते. इतर वाहने या मार्गातून जाऊ नयेत, यासाठीच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी