शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-टेम्पोच्या धडकेत लहानग्यासह ३ ठार

By admin | Updated: May 7, 2017 02:37 IST

सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन गावच्या हद्दीत, इरिगेशन कॉलनीनजीक शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास महामार्गावर थांबलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन गावच्या हद्दीत, इरिगेशन कॉलनीनजीक शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास महामार्गावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका १४ वर्षांच्या मुलांसह तिघे ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजाभाऊ विश्वनाथ पंडित (वय ४०), त्याचा मुलगा अंकुश राजाभाऊ पंडित (वय १४) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचाटे (वय ३५, तिघेही रा. धामोणी, ता. सोनपेठ, जि. परभणी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर टँकरमधील क्लीनर मेघराज नाथाराव हनवटे (वय ३६, रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड), अमित राजाभाऊ पंडित (वय १३), त्याची आई इंदुबाई राजाभाऊ पंडित (वय ३५, दोघही रा. धामोणी, ता. सोनपेठ, जि. परभणी), कांताबाई मरिबा उजगरे (वय ६०, रा. मांडवा, परळी वैजनाथ, जि. बीड) व ट्रकचालक सैफान शेख (वय २३, इंदापूर) आणि क्लीनर अमिर शेख असे सहा जण जखमी झाले आहेत. सैफान गंभीर जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धामोणी येथील पंडित कुटुंबीय भारतनगर, वाशीनाका, नवी मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या आंबेडकर जयंतीसाठी ते आपल्या मूळ गावी आले होते. पुन्हा कामावर राजाभाऊ पंडित आपली पत्नी इंदुबाई, सासू कांताबाई व मुले अंकुश, अमित, सुमित यांच्यासमवेत नवी मुंबईकडे गावातील एकनाथ बाचाटे यांचा टँकर मुंबईला निघाला असल्याने शुक्रवारी त्यांत बसून निघाले होते.हा टँकर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन गावच्या हद्दीत, इरिगेशन कॉलनीनजीक आला. त्या वेळी महामार्गाच्या मध्यावर चाक पंक्चर झाल्याने एक वाळूचा ट्रक सर्व दिवे बंद करून महामार्गावरच थांबला होता. ट्रकचालक सैफान व त्यांचा भाऊ महेश रस्त्यावर उतरून पाहणी करीत असताना, टँकरचालक बाचाटे यांस त्याचा अंदाज न आल्याने टँकरने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या वेळी महेश पळाल्याने तो थोडक्यात बचावला. परंतु टँकरमधील ७ व ट्रकनजीक असलेले दोघे असे एकूण ९ जण यांमध्ये जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरमध्ये अडकून पडलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढले; तसेच त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरांनी सर्वांची तपासणी केली. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच अंकुश राजाभाऊ पंडित व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचाटे यांचा मृत्यू झाला होता. राजाभाऊ विश्वनाथ पंडित याचा शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.