शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जिल्हा पुनर्वसन केंद्रासाठी लाटले दिव्यांगांचे साडेतीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:10 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी औंध येथे जिल्हा पुनर्वसन केंद्र ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी औंध येथे जिल्हा पुनर्वसन केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांगांचा दरमहा निर्वाह निधी आणि इतर विविध योजनांमधील साडेतीन कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा काेट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. तो निधी वापरावा, अशी स्पष्ट मागणी प्रहार अपंग क्रांती संघटना आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक खिडकी योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी जिल्हा पुनर्वसन केंद्र औंध येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारले जात आहे. ४०० चौ. मीटर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे.

----

समितीला विश्वासात न घेता ठराव

जिल्ह्यातील पाच टक्के निधी नियंत्रण करण्याकरिता जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली आहे. मात्र, या समितीला विश्वासात घेऊन ठराव पास करून हा निधी वर्ग केलेला नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेऊन निधीची तरतूद करणे गरजेचे होते. डीडीआरसी केंद्र शासनाची योजना असून केंद्र आणि राज्य यांनी निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही पुणे जिल्हा परिषद यांनी प्रथमता निधी वळवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

-----

कोट

आम्ही न्यायालयात दाद मागणार

कोरोनामुळे जिल्ह्यातील २८ हजार ७०० दिव्यांग बांधवांचे आधीच रोजगार गेले आहेत. त्यांना मदत करायचे सोडून त्यांच्या हक्काच्या निधीवर गदा आणली जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर निर्णय नाही बदलला तर याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.

----

कोट

पुणे जिल्हा परिषदेने साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुण्यातील केंद्र हे अद्ययावत व सुविधांयुक्त महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज केंद्र असणार आहे. परंतु, पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पडून असलेला निधी का वापरत नाही.

- सुरेखा ढवळे, प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग, क्रांती संघटना

----

कोट

औंध येथे होणारे केंद्र हे दिव्यांगांसाठीच आहे. ते झाले तर त्याचा सर्वात जास्त फायदा दिव्यांगांना होणार आहे. प्रकल्प चांगला असल्याने दिव्यांगांसाठीच्या योजनांचा साडेतीन कोटी रुपयांचा निधी आम्ही काम सुरू होण्यासाठी घेतला आहे. पुढच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीकडूनही निधी घेणार आहोत. प्रकल्प चांगला असल्याने दिव्यांगांना खूप फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कोरोनाकाळात जशी मदत केली तशीच मदत आम्ही पुढे करणार आहोत.

- प्रवीण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी, पुणे जिल्हा परिषद