शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारची एक ही संकल्पना लोकशाहीला हिटलरशाहीकडे नेणारी - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:12 IST

काँग्रेसच्या काळात संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञानावर देशाच्या एकूण जीडीपीपैकी १ टक्के खर्च केला जायचा मात्र आता हा ०.७ टक्क्यांवर आला आहे

पुणे: लहान मुलांना हिंदी सक्ती नकोच यावर सरकारने विचार करायला हवा. केंद्र सरकार सध्या एक निवडणूक, एक कर प्रणाली आणि कालांतराने एक भाषा म्हणजे हिंदी करणार यात शंका नाही. केंद्र सरकारची एक एकत्र ही संकल्पना १९३० साली हिटलरने उदयास आणली होती आणि आपली लोकशाही हिटलरशाहीकडे नेणारी होत चालली असून या विषयाची चिंता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले लिखित ‘असा डांगोरा शब्दांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पत्रकार अविनाश भट, रतनलाल सोनाग्रा, गोपाल तिवारी, अंकुश काकडे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अनेक देशांनी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. मात्र, आताच्या केंद्र सरकारने विज्ञान तंत्रज्ञान सध्या गुंडाळून ठेवले आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळात संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञानावर देशाच्या एकूण जीडीपीपैकी १ टक्के खर्च केला जायचा मात्र आता हा ०.७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे चीन, अमेरिकासारखे देश पुढे चालले आहेत. सध्या देशातील नामवंत संस्थेत शिक्षक मिळत नाही म्हणून ४० टक्के पदे रिक्त आहेत या सगळ्यात देशात चांगले शिक्षण कसे मिळणार. मात्र, आताचे सरकार यासर्व बाबींवर बोलणारे नाही. मात्र वृत्तपत्रातून हे परखड मत मांडले जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर म्हणाले, पहिलीपासून तीन भाषा लादणे हे अशास्त्रीय आहे. मराठी भाषा टिकावी यासाठी मराठी वृत्तपत्रे, साहित्यिक, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष यांनी आग्रही असावे. पाचवीपासून भाषा असल्यास त्याला कोणाचाही विरोध नाही. पूर्वीपासून सुरू असलेले शैक्षणिक धोरण अत्यंत चांगले आहे. हिंदीला कडाडून विरोध करण्याची गरज असून त्यामुळे विरोधात भूमिका घेतली नाही तर आपणच लहान मुलांवरील शैक्षणिक बोजा आपणच वाढवू असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा