शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पाण्याअभावी तहानले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:37 AM

वन विभागाची निष्क्रियता : मानवी वस्तीकडे प्राण्यांची धाव

- योगेश कणसे बिजवडी : इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्यप्राणी संवर्धन तसेच विविध विकासकामांसाठी मिळत आहे. मात्र, केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्यप्राण्यांसाठी पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे. परिणामी वन्यप्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात. काही वेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे. तर, काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होत आहेत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडून वन्य जिवांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सौर पंपांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. वन खात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर, चितळ, चिंकारा या जातीची हरणे आहेत. हरणांच्या या जाती वन विभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्यामार्गावर आहेत.सापमार गरूड, मोर, अदी पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एकीकडे वनसंपदेचा होणारा ºहास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठवली आहे. लाखो रुपये खर्चून वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे. इंदापूर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.टँकरचे काढले जाते बोगस बिल...वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीतकडे येताना दिसतात. त्यातच त्यांना अपघाताला, भटक्या कुत्र्यांना सामोरे जावे लागते. यातूनच त्यांच्या जीवितास धोका पोहोचतो. पाणवठे भरण्यासाठी नेमलेले टँकर ठेकेदार बोगस बिले काढतात, असा आरोप पर्यावणरप्रेमींनी केला आहे.तसेच, काही वन्यजीव प्राणी संघटना आपले खिसे भरण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे करून देखावा करत आहेत.जर हे असेच सुरू राहिले तर वन्यजीवसृष्टी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तरी, वन्यजीव संरक्षक विभागाने तातडीने योग्य कारवाई केली पाहिजे.वन विभागातील सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी नाही त्या ठिकाणी त्वरित पाणी सोडण्यात येईल.- राहुल काळे,वनपरिक्षेत्रअधिकारी, इंदापूर

टॅग्स :droughtदुष्काळwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई