शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

क्रिकेट, बॉलिवूडपेक्षा देशातील प्रश्नांवर चिंतन व्हावे : विक्रम गोखले

By admin | Published: January 12, 2015 2:29 AM

क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे.

पुणे : क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे क्रिकेट व बॉलिवूडपेक्षा देशातील समस्या व राजकारणावर अधिक चिंतन व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या छात्र संसदेतील ‘चित्रपट आणि क्रिकेट क्षेत्रापेक्षा राजकारणाला प्राधान्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ब्रिज बिहारीलाल बुटैल व लेखक व क्रीडा समालोचक विक्रम साठ्ये उपस्थित होते. आमदार जितू पटवारी, सी. एन. अश्वथनारायण यांना आदर्श आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गोखले म्हणाले, देशाला आज जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. त्यामुळे आतापर्यंतची राजकारणाची प्रतिमा विसरून नवी आदर्श प्रतिमा तयार करणे युवा वर्गाच्या हातात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित काम केले असते तर आजच्या राजकारणाचे चित्र वेगळे असते, असे गोखले यांनी नमूद केले.राजकारण हा भ्रष्टाचाराचा किंवा वाईटांचा अड्डा समजून त्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे बुटैल म्हणाले. क्रिकेट आणि चित्रपटांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सरकारकडून पर्यायाने राजकारणातून येतात. त्यामुळे तीनही क्षेत्रांचा मेळ घालायला हवा, असे साठ्ये यांनी सांगितले.(प्रतिनिधी)