शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 20:23 IST

राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात आहे

बारामती : संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भुमिका स्पष्ट केली. बारामती येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही  भुमिका मांडली.

शरद पवार म्हणाले, अजित पवारांचं संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिलं. पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेलं लिखान कोणालाही पसंत पडणारं नाही. पण ते कधीकाळी लिहिलेलं होतं .ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नसल्याचे पवार म्हणाले. 

ज्या नागरिकांना, व्यक्तींना, घटकांना संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करणं चुकीचं नाही. तर काही घटकांना संभाजीराजे धर्मवीर म्हणून पाहात असेल तर त्याविषयी तक्रार करण्याचं कारण नाही. पवार पुढं म्हणाले की, जेव्हा मी ठाण्याला जातो तेव्हा धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यामध्ये आनंद दिघे सहकारी होते. त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख करण्यावर माझा आक्षेप नाही. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला.

महाराष्ट्रात भाजपच्या वतीने ४५ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ ऐवजी मिशन ४८ करायला पाहिजे, असा टोला पवार यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण