शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्ही मराठा आरक्षण टिकवले असते; पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 23:46 IST

राज्याचे साखर संचालक डॉ.संजयकुमार भोसले यांना चव्हाण यांच्या हस्ते "संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझं सरकार राष्ट्रवादी काॅंग्रेसने २०१४ मध्ये पाडलं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं. तर आम्ही दाेघे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामाेरे गेलाे असताे आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही साेडविला असता. पहिल्यांदा ५० वर्षात मराठा आरक्षणाबाबत कुणी निर्णय घेतला असेल तर ताे मी घेतला, न्यायालयात ते टिकलं नाही. आमचे सरकार असते तर आम्ही ते टिकवले असते असे मत माजी मुख्यमंत्री काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कॉम्पिटिटर्स फाऊंडेशनच्या वतीने राज्याचे साखर संचालक डॉ.संजयकुमार भोसले यांना चव्हाण यांच्या हस्ते "संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी.पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जायभाये, उपाध्यक्ष डॉ.मनोज मते, सचिव ॲड.विठ्ठल देवखिळे, संजय येनपुरे आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही हे सर्वश्रुत आहे. राज्य सहकारी बॅंकेबद्दल मला कडक निर्णय घ्यावे लागले. बाेर्ड बरखास्त करीत प्रशासकांनाही काढावे लागले. त्याची खूप माेठी राजकीय किंमत मला माेजावी लागली. हर्षद मेहता स्कॅम नंतर मी बॅंकिंग क्षेत्राचा अभ्यास केला. दिल्लीहून कराडला यायचाे तेव्हा संजयकुमार भाेसले यांच्याकडून सहकार क्षेत्रातील विषय समजत गेले. लाेकसभा निवडणूकीत २०१४ मध्ये काॅंग्रेसचे केवळ दाेन खासदार निवडून आले. त्यापैकी एक राजीव सातव हे हाेते असे सांगत आठवणींना उजाळा दिला.

रजनी सातव म्हणाल्या, माझ्या मुलाच्या नावे पुरस्कार दिला जाताेय याचे मला समाधान आहे. याप्रकारे सर्व मित्र एकत्रित येतील भेटतील असे वाटलं नव्हते. तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नांना यश यावे ही प्रार्थना करते. यावेळी मुलाच्या आठवणींनी त्यांना अश्रू अनावर झाले.शिक्षणाच्या खासगीकरणामुळे अधाेगतीशिक्षण क्षेत्रातील खासगीकरणामुळे खूप माेठी अधाेगती झालेली आहे. त्यामुळे समताेल पुन्हा साधावा लागेल. राज्यसरकारने अभियंते, तहसिलदार पदे खासगीकरणातून भरण्याची जाहिरात काढली. मुलं आरक्षणासाठी आंदाेलन करीत आहेत मात्र, सरकारी जागाच नसतील तर आरक्षण मिळाले तर त्याचा लाभ कसा मिळेल ? असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणRajeev Satavराजीव सातव