शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत : भाग्यश्री देसाई, अभिनेत्री आणि निर्माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

गतवर्षीचा कोरोना काळ कलविश्वाची परीक्षा घेणारा ठरला. आमच्या ‘ब्लाईंड गेम’ नाटकाचा शेवटचा प्रयोग 12 मार्च 2020 ला झाला आणि ...

गतवर्षीचा कोरोना काळ कलविश्वाची परीक्षा घेणारा ठरला. आमच्या ‘ब्लाईंड गेम’ नाटकाचा शेवटचा प्रयोग 12 मार्च 2020 ला झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. पुण्या-मुंबईमधील शो रद्द करण्याची वेळ आली. आमचे सगळे पैसे वाया गेले. जवळपास 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात तब्बल नऊ महिने कलाविश्व ठप्प होते. ज्यांचे हातावर पोट होते. त्या पड्यामागच्या कलाकारांचे खूप हाल झाले. लॉकडाऊन किती चालेल याची माहिती नसल्याामुळे आम्ही निर्मात्यांनी पुण्यातील 40 पडद्यामागच्या कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्या काळात काही कलाकारांनी भाजीविक्री, कपड्यांना इस्त्री करून देणे, प्लंबिंग, दुरूस्ती यांसारखी कामे केली. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात आल्यानंतर शासनाने लॉकडाऊन शिथिल केले मात्र नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांची 1000 ची क्षमता आहे याचा अर्थ 500 प्रेक्षकच येणार. यातच पहिल्या रांगा मिळाल्या नाही तर आम्हाला मागची रांग नको. आम्ही पुढच्या प्रयोगाला येऊ, असे प्रेक्षक म्हणत आहेत. एक मात्र आहे की महापालिकेने नाट्यगृहांचे भाडे वाढवले नाही. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. पण आम्हाला 4 ते 5 हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. आता 14 फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. त्याच्यानंतरचे तीन प्रयोग मी रद्द केले. कलाकार देखील काम करायला घाबरू लागले आहेत. कारण चेहऱ्याला मास्क लावून रंगमंचावर काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही 20 फेब्रुवारीपासून प्रयोग थांबवले आहेत. शासनाने कलाकारांचा विचार करून ठोस निर्णय घ्यायला हवे आहेत.

----------------------------------------------------------------