शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Vande Bharat Express: नागपूर ते पुणे एक आठवड्यापूर्वी सुरु झालेल्या ‘वंदे भारत’ला पावणेदोन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:21 IST

नागपूर ते पुणे हे अंतर १२ तासात पूर्ण करते, मात्र तिला १४ तास लागले

पुणे : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियोजित वेळेवर धावण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, रविवारी पुण्याकडे येणाऱ्या अप लाइनवर मालगाडीचा खोळंबा झाल्याने मूर्तिजापूर स्थानकावर वंदे भारत दोन तास थांबविण्यात आली. त्यामुळे नागपूर-पुणे वंदे भारत रविवारी ९ वाजून ५० मिनिटांऐवजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोहोचली. नियोजित वेळेपेक्षा पावणेदोन तास उशीर झाला.

एका आठवड्यापूर्वी पुणे ते नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास सोयीचा झाला आहे. ही एक्स्प्रेस नागपूरवरून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी निघते. पुण्यात रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोहचते. १२ तासांत वंदे भारत हे अंतर पूर्ण करते. इतर एक्स्प्रेस गाड्या नागपूरवरून पुण्याला पाेहचण्यासाठी १५ ते १६ तासांचा वेळ घेतात. यामुळे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी नागपूरवरून नियोजित वेळेत वंदे भारत निघाली, परंतु अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर स्थानकाजवळ मालगाडी खोळंबली होती. त्यामुळे वंदे भारत दोन तास एकाच जागी थांबून होती. यामुळे प्रवाशांना दोन तास ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे पुढील स्थानकावर पोहचण्यासाठी वंदे भारतला उशीर झाला.

 

टॅग्स :PuneपुणेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसnagpurनागपूरrailwayरेल्वेpassengerप्रवासी