शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी तरुणाचा दुर्दैवी अंत; डोक्यात झाडाची फांदी कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:25 IST

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच प्रशासनाकडून धोकादायक फांद्या तोडल्या गेल्या तर अशा घटना घडून लोकांचे जीव जात नाहीत

पुणे: पुण्याच्या शनिवार पेठेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या टपरीवर चहा पित थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात झाडाची फांदी कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अभिजीत गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अभिजीत सायंकाळी मित्रांसोबत टपरीवर चहा पिण्यासाठी आला होता. अचानक झाडाची फांदी अभिजीतच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या अभिजीतला नागरिकांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादायक फांद्या तोडल्या जातात. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने अशा घटना घडतात. याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असल्याचे त्याठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका