शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:41 IST

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे

पुणे : महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातून मंत्री, राजकीय पदाधिकारी येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

सपकाळ म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांचे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माणमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जी परिवर्तनाची समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली. याची ज्योत याची तेवत ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेल आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले. त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. 

संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. आणि आज या निमित्तानं याठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत याठिकाणी येण्याचं विशेष कारण की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे जो वैचारिक मशाल आहे. ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. आणि आगामी काळात काँग्रेस ही वैचारिक लढाई लढणार आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे. तो आम्हाला शिरसावंद्य आहे. एवढंच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगावसं वाटतंय.

महात्मा फुलेंचा जो विचार आहे तो विचार आज पुन्हा एकदा त्या विचाराने संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच याठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की,  पूर्वी तसं होत होतं आज होत नाही. आणि हे सांगत असताना त्यांनी आज ही जो भेदाभेद होत आहे. ज्या शाळा ज्या आहेत सरकारी शाळा त्या बंद होत आहेत.  महिलांवर अत्याचार जे वाढत आहेत. याला मात्र त्यांनी बगल दिली. अत्याचार तेव्हा जे होत होते ते कोणत्या विचारसणीमुळे होत होते. या स्वयंसेवक संघाच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकांमध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे. भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट आहे. महिलांनी शिकू नये हे त्यामध्ये मान्य केलेला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाBJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र