शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

"दो आँखे बारह हाथ", च्या पुढचे पाऊल; राज्य सहकारी बँकेकडून कैद्यांनाही मिळणार कर्ज, उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:27 IST

राज्य सहकारी बँकेकडून आता राज्यातील विविध तुरूंगामध्ये वेगवेगळ्या कारणांनी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही कर्ज देण्यात येणार

राजू इनामदर 

पुणे: राज्य सहकारी बँकेकडून आता राज्यातील विविध तुरूंगामध्ये वेगवेगळ्या कारणांनी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही कर्ज देण्यात येणार आहे. १ मे ला महाराष्ट्र दिली येरवडा कारागृहातील २२२ कैद्यांना कर्ज वितरीत करून या अभिनव योजनेची सुरूवात होईल. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असून कैद्यांना कर्ज देणारी राज्य सहकारी बँकही देशातील पहिली बँक आहे.

कोणत्याही गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. कर्ज मर्यादा ५० हजारांपर्यंत असेल. त्याची फेड कैदी कारागृहात करत असलेल्या कामासाठी त्याला देत असलेल्या मोबदल्यामधून करून घेतली जाईल. कर्जाची रक्कम कैद्याच्या नाही तर त्याच्या कुटुंबियांच्या हातामध्ये दिली जाईल. त्याचा विनियोगही कुटुंबाने करायचा आहे. कर्ज फेडण्याची जबाबदारी मात्र कैद्याची आहे.

तुरूंगामध्ये कैद्याकडून वेगवेगळी कामे करून घेतली जातात. त्यासाठी त्याला दिवसाला साधारण ६७ रूपये मोबदला मिळतो. त्यातील काही पैसे त्याच्या कॅंटिन सुविधेसाठी राखीव ठेवले जातात. उर्वरित पैशांमधून दरमहा साधारण २ हजार रूपयांचा हप्ता कैद्याकडून या कर्जासाठी घेतला जाईल. येरवडा कारागृहातून या योजनेसाठी राज्य सहकारी बँकेकडे २२२ अर्ज आले होते. त्या सर्वांना हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

कैद्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी......

बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी सांगितले की, तुरूंगातील बहुतांश कैदी ग्रामीण भागातले असतात. ते सराईत नसतात. रागाच्या भरात किंवा अन्य काही कौटुंबिक कारणाने त्यांच्याकडून गुन्हा झालेला असतो. ते तुरूंगात असल्याने त्यांच्या कुटुंबांचे हाल होतात. कैद्याला वाटते कुटुंबाने आपल्यासाठी काही करावे व कुटुंबाला हा माणूस आपल्यासाठी काहीच करत नाही असे वाटत असते. त्यामुळे त्यांच्यात ताण निर्माण होतो. शेतीची कामे, मुलांची शाळेछी फी किंवा अन्य अत्यावश्यक कौटुंबिक खर्चासाठी त्यांच्याकडे अजिबात पैसे नसतात.

या कर्जामुळे ही अडचण दूर होईल. पैसे त्यांच्या कुटुंबियांच्या हातात दिले जाणार आहेत, त्यामुळे त्याचा योग्य कारणांसाठीच विनियोग होईल याची खात्री देता येते. मात्र पैसे कसे खर्च करायचे याचा अधिकार त्यांच्या कुटुंबालाच आहे. ते यातून आपल्या कैद्यासाठी चांगल्या वकिलाचा खर्चही करू शकतात. ते बंधन बँकेने त्यांच्यावर ठेवलेले नाही. मात्र त्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, पैशांअभावी त्यांचा संसारच मोडून पडू नये, मुलांचे शिक्षण थांबू नये अशा उद्देशाने बँकेने ही योजना सुरू केली असल्याचे अनासकर यांनी सांगितले. या कर्जावर फक्त ७ टक्के व्याज आहे. तसेच जी काही उलाढाल होईल त्यातील १ टक्के रक्कम बँकेच्या वतीने तुरूंग प्रशासनाला कैद्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यास मदत म्हणून दिली जाणार आहे.

१ मेला दुपारी हा कर्ज वितरणाचा कार्यक्रम होईल

'तुरूंगातील कर्मचाऱ्यांना कर्ज वाटपासाठी गेलेलो असताना काही कैद्यांच्या कथनाकडून त्यांची स्थिती समजली. त्यावरून या योजनेचा जन्म झाला. याला कायदेशीर मान्यतेची गरज होती. कायद्याच्या कक्षेत हे येते किंवा नाही याचा अभ्यास केल्यानंतर काही अडचण नाही असे लक्षात आले. त्यामुळे राज्य सरकारने योजनेला त्वरीत मान्यता दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत १ मेला दुपारी हा कर्ज वितरणाचा कार्यक्रम होईल असे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी सांगितले.' 

टॅग्स :YerwadaयेरवडाPuneपुणेjailतुरुंगPoliceपोलिसbankबँकGovernmentसरकार