शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 11:44 IST

भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी ते म्हणतात, आम्हाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यात आली. प्रत्येक आमदाराला ५० कोटी देऊन आमचे सरकार पाडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राने, देशाने उघड्या डोळ्यांनी हे राजकारण पाहिले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवायची. येत्या लोकसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बारामतीत गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी पुत्र व कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना व राष्ट्रवादी फुटली, या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना ही टीका केली.

देशमुख पुढे म्हणाले, फोडाफोडीला जनता कंटाळली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ती उत्तर देईल. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेले आहेत, त्यातील अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आमदारांची मोठ्या प्रमाणात घरवापसी झाल्याशिवाय राहणार नाही, असादेखील दावा देशमुख यांनी केला.

देशमुख पुढे म्हणाले, सध्या भाजपचे आमदार बिचारे सर्वांत दु:खी आहेत. आम्हाला ते विधानसभेत भेटतात. ते म्हणतात बाहेरून आमच्या पक्षात आलेले लोक मंत्री होतात, आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत बसतो. बाहेरून येणारे पहिल्या पंक्तीत बसले. आमचा अजून नंबर लागत नाही. त्यांना बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात. त्यामुळे या सगळ्यात भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी आहेत. त्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचे देशमुख म्हणाले.

यावेळी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांचे काैतुक केले. सुळे यांचे गेल्या १५ वर्षांतील काम संपूर्ण देशाला माहीत आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून त्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. कामाच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात. बारामती मतदार संघातील जनता त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देईल, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखcongressकाँग्रेसBJPभाजपाBaramatiबारामतीlok sabhaलोकसभा