शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:29 IST

दावणीला बांधलेले बैलही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात

कल्याणराव आवताडे

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका शेतकऱ्याने ‘सरपंच’ व ‘आमदार’ नावाची कोल्हापूरची खिलारी बैलजोडी तब्बल सहा लाख एकावन्न हजाराला विकत घेतली आहे. एवढ्या मोठ्या किमतीचे बैल विकत घेतल्याने हौसेला मोल नसते, याची प्रचिती आली आहे. पांडुरंग उर्फ तात्या ज्ञानोबा चौधरी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी गडहिंग्लज येथील शेतकरी काशिनाथ बेळगुद्री यांच्याकडून ही बैलजोडी विकत घेतली आहे.

पांडुरंग चौधरी हे सिंहगड रस्ता भागातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. या यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलजोडीच्या सहाय्यानेच शेतीची कामे करण्यास ते पसंती दाखवतात. त्यांच्या मते ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही तो शेतकरीच नाही. बैलजोडी ही शेतकऱ्याची आन, बान आणि शान आहे. ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती, त्यावेळेपासून त्यांनी शर्यतीसाठी बैल नेणे बंद केले. त्यांच्याकडे एकूण ५ बैल आहेत. बीट, गाजर, मक्याचे कणीस, गव्हाचे कणीस, शेंगदाणा पेंड, भुसा व इतर बैलांच्या खाद्यासाठी दररोज अडीच हजार रुपये खर्च करतात. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, सध्या ते पूर्णवेळ शेती करतात. गेल्या ३६ वर्षांपासून दर बैलपोळ्याला ते नवीन बैलजोडी आणतात. चौधरी यांचे बैल दरवर्षी कर्वेनगर येथील शहीद मित्रमंडळातर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीमध्ये दरवर्षी मिरवणुकीला असतात. या कामात त्यांना भाचा अमित शेलार ही मदत करतात. या यांत्रिकीकरणाच्या युगातही शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने करण्यास पसंती देतात. केवळ हौसेपोटी घेतलेली सरपंच व आमदार ही बैलजोडी कोणालाही भावेल एवढी मनमोहक दिसत असून, सोशल मीडियामध्ये अनेक शेतकऱ्यांना या बैलजोडीने मोहून घेतले. या बैलजोडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ही जोडी रातोरात ‘फेमस’ झाली आहे.

बैलांशी पिता-पुत्राप्रमाणे नाते...

माझे आणि दावणीला बांधलेल्या बैलाचे नाते हे अगदी पिता-पुत्राच्या नात्याप्रमाणे आहे. आम्ही आपल्या दावणीला बांधलेल्या जनांवरावर अतोनात प्रेम करतो. दावणीला बांधलेली जनावरे ही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात. खरंतर अनेक शेतकरी हे खूप हौशी असतात. ते आपल्या दावणीला जातिवंत बैल ठेवतात. अलीकडे ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैलजोडीचे प्रमाण कमी झाले असले, तरीदेखील काही हौशी शेतकरी शेतकऱ्याची शान म्हणून बैलजोडी आवर्जून बाळगतात. मला दोन मुली आहेत. त्यांची लग्नं झाली आहेत. ही परंपरा गेल्या सहा पिढ्यांपासून आहे. माझ्या माघारी ही परंपरा खंडित होणार, याची खंत वाटत असल्याचे पांडुरंग चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

''धारेश्वरवरून आमच्या गावाचे नाव धायरी पडले आहे. महादेवाचे वाहन व शेतकरी म्हणून बैलांना आम्ही अनन्यसाधारण महत्त्व देतो. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आम्ही दरवर्षी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. - पांडुरंग चौधरी, प्रगतशील शेतकरी, धायरी'' 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNatureनिसर्गSocialसामाजिकDhayariधायरीMONEYपैसा