शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:29 IST

दावणीला बांधलेले बैलही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात

कल्याणराव आवताडे

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका शेतकऱ्याने ‘सरपंच’ व ‘आमदार’ नावाची कोल्हापूरची खिलारी बैलजोडी तब्बल सहा लाख एकावन्न हजाराला विकत घेतली आहे. एवढ्या मोठ्या किमतीचे बैल विकत घेतल्याने हौसेला मोल नसते, याची प्रचिती आली आहे. पांडुरंग उर्फ तात्या ज्ञानोबा चौधरी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी गडहिंग्लज येथील शेतकरी काशिनाथ बेळगुद्री यांच्याकडून ही बैलजोडी विकत घेतली आहे.

पांडुरंग चौधरी हे सिंहगड रस्ता भागातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. या यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलजोडीच्या सहाय्यानेच शेतीची कामे करण्यास ते पसंती दाखवतात. त्यांच्या मते ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही तो शेतकरीच नाही. बैलजोडी ही शेतकऱ्याची आन, बान आणि शान आहे. ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती, त्यावेळेपासून त्यांनी शर्यतीसाठी बैल नेणे बंद केले. त्यांच्याकडे एकूण ५ बैल आहेत. बीट, गाजर, मक्याचे कणीस, गव्हाचे कणीस, शेंगदाणा पेंड, भुसा व इतर बैलांच्या खाद्यासाठी दररोज अडीच हजार रुपये खर्च करतात. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, सध्या ते पूर्णवेळ शेती करतात. गेल्या ३६ वर्षांपासून दर बैलपोळ्याला ते नवीन बैलजोडी आणतात. चौधरी यांचे बैल दरवर्षी कर्वेनगर येथील शहीद मित्रमंडळातर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीमध्ये दरवर्षी मिरवणुकीला असतात. या कामात त्यांना भाचा अमित शेलार ही मदत करतात. या यांत्रिकीकरणाच्या युगातही शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने करण्यास पसंती देतात. केवळ हौसेपोटी घेतलेली सरपंच व आमदार ही बैलजोडी कोणालाही भावेल एवढी मनमोहक दिसत असून, सोशल मीडियामध्ये अनेक शेतकऱ्यांना या बैलजोडीने मोहून घेतले. या बैलजोडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ही जोडी रातोरात ‘फेमस’ झाली आहे.

बैलांशी पिता-पुत्राप्रमाणे नाते...

माझे आणि दावणीला बांधलेल्या बैलाचे नाते हे अगदी पिता-पुत्राच्या नात्याप्रमाणे आहे. आम्ही आपल्या दावणीला बांधलेल्या जनांवरावर अतोनात प्रेम करतो. दावणीला बांधलेली जनावरे ही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात. खरंतर अनेक शेतकरी हे खूप हौशी असतात. ते आपल्या दावणीला जातिवंत बैल ठेवतात. अलीकडे ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैलजोडीचे प्रमाण कमी झाले असले, तरीदेखील काही हौशी शेतकरी शेतकऱ्याची शान म्हणून बैलजोडी आवर्जून बाळगतात. मला दोन मुली आहेत. त्यांची लग्नं झाली आहेत. ही परंपरा गेल्या सहा पिढ्यांपासून आहे. माझ्या माघारी ही परंपरा खंडित होणार, याची खंत वाटत असल्याचे पांडुरंग चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

''धारेश्वरवरून आमच्या गावाचे नाव धायरी पडले आहे. महादेवाचे वाहन व शेतकरी म्हणून बैलांना आम्ही अनन्यसाधारण महत्त्व देतो. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आम्ही दरवर्षी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. - पांडुरंग चौधरी, प्रगतशील शेतकरी, धायरी'' 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNatureनिसर्गSocialसामाजिकDhayariधायरीMONEYपैसा