पुणे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (दि. ८) विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे होते. मात्र, निवड झाली नाही. तशी हालचाल दिसत नाही. सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते. कदाचित विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. हिवाळी अधिवेशात विदर्भातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. मात्र, या अधिवेशनात विदर्भाला न्याय दिला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होत आहे. या मुद्द्याला धरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते, असे मत व्यक्त केले.
नाशिक येथील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत विचारले असता ते म्हणाले, कुंभमेळ्याला विरोध नाही. पण, झाडे तोडणे योग्य नाही. नाशिककर हे मोडून काढतील. मुंढवा जमीन घोटाळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, समिती नेमली आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर बोलणे योग्य राहील.
Web Summary : Jayant Patil criticized the government for not appointing an opposition leader, suggesting they are comfortable without one. He also highlighted the lack of attention to Vidarbha's issues during the winter session and opposed tree cutting in Nashik.
Web Summary : जयंत पाटिल ने सरकार पर विपक्ष का नेता नियुक्त न करने की आलोचना की, यह सुझाव देते हुए कि वे इसके बिना सहज हैं। उन्होंने शीतकालीन सत्र के दौरान विदर्भ के मुद्दों पर ध्यान न देने और नासिक में पेड़ काटने का भी विरोध किया।