शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

स्वतःच्या शेतजमिनीत जाण्यास शेतकरी महिलेला मिळेना,'न्याय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:59 IST

जमिन मोजणीसाठी तहसील कार्यालयासमोर करणार उपोषण

शिरूर : तालुक्यातील सविंदणे येथील शेतकरी महिलेच्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीची सरकारी मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस बंदोबस्त असताना सात ते आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून हाकलून दिल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.२९) घडला. त्यांच्यावर ना भूमी अभिलेख कार्यालयाने कारवाई केली ना पोलिसांनी, यामुळे गेली काही वर्षांपासून स्वत:च्या जमिनीत जाण्यास अटकाव केला जात असल्याने त्रस्त शेतकरी महिलेने न्याय मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मंदा तानाजी रोकडे (रा. सविंदणे, ता. शिरूर) असे पीडित शेतकरी महिलेचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय शिरूर येथे अर्ज केला होता. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी मोजणी मंजूर करण्यात आली होती. त्यावेळीही त्या जमिनिशी काहीही संबंध नसलेल्या काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे हरकत घेऊन वादविवाद केला. त्याच लोकांनी मंदा रोकडे यांच्या मालकीच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी स्थगिती द्यावी म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख व घोडनदी न्यायालयात अर्ज केला. परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यासाठीचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी (दि.२९) रोजी मोजणी कर्मचारी पीयूष बगाडे, पोलिस कर्मचारी व अर्जदार शेतात मोजणी करण्यासाठी गेले असता. तेथे भिवा खुमाजी पडवळ, भक्तिराम शिवराम पडवळ, रतन दत्तात्रेय पडवळ यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यापासून मज्जाव करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली. तरीही भूमी अभिलेख अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अर्जदार मंदा तानाजी रोकडे यांनी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

भूमी अभिलेखचा अजब कारभारमहिला शेतकरी रोकडे यांची स्वत:च्या मालकीची जमीन आहे. तर अडथळा करणाऱ्यांचा त्या जमिनीशी काडीमात्र संबंध नाही. ना त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यात त्यांचे नाव आहे, ना त्या गट नंबरमध्ये, ना त्यांची शेजारी जमीन आहे. ना ते त्या गावचे रहिवासी आहेत. असे असतानाही चिरीमिरीसाठी शिरूर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी अडथळा करणाऱ्यांचा रोकडे यांच्या विरोधातील अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही केली. असे होत राहिले तर कोणी कुठल्याही शेकऱ्याच्या जमिनीवर हरकत घेऊन शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात आणि शेतकऱ्यांना स्वत:ची जमीन कसता येणार नाही. असे शेतकरी संगत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी