शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

केंद्र सरकार देशातील शेतकरी संपवण्याच्या प्रयत्नात; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:58 IST

देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली असून ३ तारखेपासून राज्यभर पदयात्रा काढणार

मंचर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून केंद्र सरकार शेतकरी संपविण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष पार पाडणार असून त्यासाठी तीन तारखेपासून राज्यभर पदयात्रा केली जाणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

मंचर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कार्पोरेट सेक्टरला फास लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. घटना दुरुस्ती करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना लुटण्यासाठी जीएसटी व्यवस्था आणली आहे .केंद्राने आर्थिक धोरण आखून जीएसटी कर आणला.  त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसतो आहे. बँकांनाही जीएसटी भरावा लागत असून जर जीएसटी भरला नाही तर केंद्र सरकार दंड न करता मनी लॉन्ड्री केस लावते आणि ईडीचा ससेमीरा मागे लावला जातो. असे सांगून पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना अक्षरशा माल फेकून द्यावा लागत आहे. सरकारची धोरणे याला कारणीभूत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलेलाच नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तीन ते बारा तारखेदरम्यान राज्यात पदयात्रा काढली जाणार आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवणार आहे.याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मागणी करूनही सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणcongressकाँग्रेस