शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

केंद्र सरकार देशातील शेतकरी संपवण्याच्या प्रयत्नात; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:58 IST

देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली असून ३ तारखेपासून राज्यभर पदयात्रा काढणार

मंचर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून केंद्र सरकार शेतकरी संपविण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष पार पाडणार असून त्यासाठी तीन तारखेपासून राज्यभर पदयात्रा केली जाणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

मंचर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कार्पोरेट सेक्टरला फास लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. घटना दुरुस्ती करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना लुटण्यासाठी जीएसटी व्यवस्था आणली आहे .केंद्राने आर्थिक धोरण आखून जीएसटी कर आणला.  त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसतो आहे. बँकांनाही जीएसटी भरावा लागत असून जर जीएसटी भरला नाही तर केंद्र सरकार दंड न करता मनी लॉन्ड्री केस लावते आणि ईडीचा ससेमीरा मागे लावला जातो. असे सांगून पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना अक्षरशा माल फेकून द्यावा लागत आहे. सरकारची धोरणे याला कारणीभूत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलेलाच नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी तीन ते बारा तारखेदरम्यान राज्यात पदयात्रा काढली जाणार आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवणार आहे.याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मागणी करूनही सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणcongressकाँग्रेस