शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केंद्र सरकारने केले; अमोल कोल्हेंची टीका, जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:14 IST

केंद्राला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले की केंद्राला संसदेत गदारोळ वाटतो

जुन्नर :  कांद्याचे भाव पाडण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आता लढायचं नाही तर रडायचं आपल्या हक्काचं ठणकावून घ्यायचं असा निर्धार  खासदार अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या शुभारंभ प्रसंगी केला. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना अभिवादन करत शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.

 खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, संसदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे व मी कांदा निर्यात बंदी विषयी चर्चा करत होतो. केंद्राला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही .शेतकऱ्याचे प्रश्न मांडले की केंद्राला संसदेत गदारोळ वाटतो. म्हणून आमचे निलंबन करण्यात आले. आमच्या भावना दडपणाचे काम संसदेत होते. म्हणून रस्त्या उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारचा कानावर पोहोचण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 कांद्याचे दर वाढून शेतकऱ्याला  पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर निर्यातबंदी केली जाते. मागील काळात कांद्यावर चाळीस टक्के ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर २४१० रुपये दराने शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याची घोषणा सरकारने केली होती. यामध्ये किती शेतकऱ्यांचा कांदा विकत घेतला असा सवाल कोल्हे यांनी केला.  

टोमॅटो ,सोयाबीनला भाव मिळायल्या लागल्यावर नेपाळ वरून टोमॅटो आयात करण्यात आला तसेच ऑस्ट्रेलिया वरून कापूस आयात करण्यात आला. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतावर अठरा टक्के जीएसटी लावण्यात आला. खतावरील सबसिडी हजारो कोटींनी कमी करण्यात आली. शेतीत उत्पादन कमी आले तर शेती औषधे खते विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा देणारे केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्याना मोकळे रान देतात.                

देशात मोजक्या उद्योगपतींचे 25 लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले तर काही हजार रुपयांसाठी साठी शेतकरी आत्महत्या  करतो. महाराष्ट्रात 266 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. याची केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे अशी टीका कोल्हे यांनी केली. दूध दरवाढीचे अनुदान देताना शासकीय दूध संस्थांना दूध घालणारे शेतकरी व खाजगी दूध संस्थांना दूध घालणारे शेतकरी असा भेदाभेद न करता सरसकट सर्वांना अनुदान देण्याची  मागणी कोल्हे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदFarmerशेतकरी