शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

सुशासनामुळे अश्रूंची होतील फुले

By admin | Updated: April 30, 2016 00:42 IST

भारतात सध्या ३ कोटी खटले प्रलंबित आहेत. न्यायदानाचा वेग लक्षात घेता, हे खटले निकाली काढण्यासाठी किमान ३२० वर्षे लागतील.

पुणे : भारतात सध्या ३ कोटी खटले प्रलंबित आहेत. न्यायदानाचा वेग लक्षात घेता, हे खटले निकाली काढण्यासाठी किमान ३२० वर्षे लागतील. यापैकी निम्म्या खटल्यांमध्ये सरकारच पक्षकार आहे. निकालाच्या संथ प्रक्रियेचा सरकारला काहीच फरक पडत नाही. खटल्यांच्या आकडेवारीचे दडपण, सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे सरन्यायाधीशांना अश्रू अनावर झाले. त्यांना वाटणारी चिंता व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. सरकार आणि न्यायव्यवस्थेतील संघर्ष संपुष्टात आल्यास, तसेच देशात सुशासन प्रस्थापित झाल्यास या अश्रूंची फुले होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. समाजविज्ञान अकादमीतर्फे ‘सरन्यायाधीशांचे अश्रू... कशामुळे? कशासाठी?’ या विषयावरील परिसंवाद आयोजिण्यात आला होता. या परिसंवादात अ‍ॅड. संदीप ताम्हनकर, अजित अभ्यंकर यांनी सहभाग घेतला. या वेळी देशातील शासनव्यवस्थेवर नेमकेपणाने भाष्य करण्यात आले.अजित अभ्यंकर म्हणाले, ‘‘सरन्यायाधीशांच्या डोळ््यातील अश्रू ही असामान्य घटना आहे. न्यायव्यवस्था धोक्यात असेल तर सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासन न्यायालयातून चालवावे लागते, हे दुर्दैव. दाभोळकर, पानसरे यांच्या खुनाचा तपास करायचा की नाही, असा प्रश्न उच्च न्यायालय विचारते. अशा घटना पाहता, देशात सरकार आहे का, असा प्रश्न पडतो. शासनाचे अपयश न्यायपालिकेप्रमाणेच न्यायपालिकेतही आहे. सरकारने एखादा कायदा केला तरी तो चालवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली जात नाही. कच्च्या कैद्यांची वाढती संख्या ही गुन्हेगारीचे बीज आहे. सुशासन निर्माण करण्यासाठी पैसे नाहीत, अशी ओरड सरकार करत असेल सरकारच्या उत्पन्नाबद्दलही बोलले पाहिजे. भारतातून पुरेसा कर गोळा केला जात नाही, हे वास्तव आहे. २०१२ च्या अहवालानुसार, उच्च न्यायालयामध्ये ४२० रिक्त जागा आहेत. त्या भरण्याबाबत सरकार उदासीन असेल, तर हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. सरकारने ही उदासीनता झटकून काम केल्यास सरन्यायाधीशांच्या अश्रूंची फुले होतील.’’ (प्रतिनिधी)>३ कोटी खटल्यांचा केव्हा निकाल? ताम्हनकर म्हणाले, ‘‘३ कोटी खटले निकाली लावायचे असतील तर ती केवळ न्यायाधीशांची नव्हे; तर सर्व घटकांची जबाबदारी आहे. त्यामुळे काळाची हाक ऐकून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. भारतातील तुरुंगांमध्ये तब्बल ३ लाख कच्चे कैदी खितपत पडले आहेत. १० लाख लोकसंख्येमागे भारतात केवळ १७ न्यायाधीश आहेत. त्यामुळे कामकाजाला गती कशी मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. नॅशनल ज्युडिशियल अपॉइनमेंट कमिशन कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. त्यामुळे, सध्या कॉलेजियममार्फत न्यायाधीशांच्या नेमणुका होतात. त्यासाठी लागणारा गुप्तचर अहवाल सरकार सादर करीत नाही. न्यायसंस्था ही अनाथ झाली आहे. तिचे पालकत्व घ्यायला कोणी तयार नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे. सरकार आणि न्यायव्यवस्थेतील संघर्ष संपल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते.’’