शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:45 IST

पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले.

ठळक मुद्देगेल्या पाच महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १२ टीएमसी पाणी संपले जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागणार वाढीव लोकसंख्येचे पुरावे सादर करण्यात पालिका प्रशासन अपयशी

पुणे: वाढत्या नागरिकारणामुळे पुणे शहर व परिसराला लागणा-या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र,धरणातील पाणीसाठ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे वाढ न होता घटच होत आहे. त्यातही गेल्या पाच महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १२ टीएमसी पाणी संपले आहे. जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागतील. तेव्हाच सर्व घटकांना समान पाणी देणे शक्य होईल,असे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले. पाण्यावरून शहरी व ग्रामीण असा वाद पेटला आहे.  ग्रामीण भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात आणि आता उच्च न्यायालयात पुण्याच्या पाणी प्रश्नावर न्याय मागितला जात आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारे प्राधिकरणाकडून पालिकेला पाणी मंजूर केले जाते. परंतु, वाढीव लोकसंख्येचे पुरावे सादर करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे शहराला वाढीव पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वितरणाचा करार संपुष्टात आला असला तरी पालिकेला हवे तेवढे पाणी दिले जात आहे. मात्र, त्यावर हरकत घेत इंदापूरचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत राज्य शासनाला पुणे महापालिकेचे पाणी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पालिकेला वाढलेल्या लोकसंख्येचे अचूक पुरावे सादर करणे भाग पडणार आहे. तसेच सध्या धरणातून पाणी उचलण्याची यंत्रणा पालिकेच्या ताब्यात आहे.परंतु, पुढील काळात पालिकेला मनमानीपध्दतीने पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे पुणे शहराची वाढलेली तहान वेळीच आटोक्यात आणावी लागणार आहे.पुणे महापालिका हद्दीत नवीन ११ गावांचा समावेश झाला आहे.मात्र,अद्याप या गावांमधील सर्व नागरिकांना पालिकेने पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. लोकसंख्येचे पुरावे सादर करताना मात्र या ११ गावांमधील लोकसंख्या गृहित धरली आहे. या गावांमधील नागरिकांना पाणी  उपलब्ध करून देण्याची वेळ आल्यावर सध्या धरणातून घेतले जात असलेले पाणी कमीच पडणार आहे. त्यामुळे वेळीच शहर व ग्रामीण भागाच्या वाढत चाललेल्या पाणी वापराचे योग्य नियोजन करावे लागणार आहे,असेही जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सांगितले.

....

* खडकवासला धरण प्रकल्पात ५ जानेवारी रोजी १७.५१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.धरणात ५ मे रोजी केवळ ५.६१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागाने गेल्या पाच महिन्यात ११.९ टीएमसी एवढा पाणी संपवला असल्याचे स्पष्ट होत आहे.५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत धरणातील ३.४३ टीएमसी पाणी संपले.तर ५ फेब्रुवारी ते ५ मार्च या महिन्याभराच्या काळात 2.7 टीएमसी तर ५ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान १.९४ टीएमसी आणि ५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ३.८३ टीएमसी पाण्याचा वापर झाला.त्यामुळे गेल्या पाच महिन्यात शहर व ग्रामीण भागाने तब्बल बारा टीएमसी पाणी वापरले आहे.परंतु,पुढील काळात उपलब्ध धरणसाठा आणि पाण्याचा वापर यांचा ताळमेळ घालावा लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका