शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:45 IST

पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले.

ठळक मुद्देगेल्या पाच महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १२ टीएमसी पाणी संपले जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागणार वाढीव लोकसंख्येचे पुरावे सादर करण्यात पालिका प्रशासन अपयशी

पुणे: वाढत्या नागरिकारणामुळे पुणे शहर व परिसराला लागणा-या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र,धरणातील पाणीसाठ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे वाढ न होता घटच होत आहे. त्यातही गेल्या पाच महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १२ टीएमसी पाणी संपले आहे. जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागतील. तेव्हाच सर्व घटकांना समान पाणी देणे शक्य होईल,असे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले. पाण्यावरून शहरी व ग्रामीण असा वाद पेटला आहे.  ग्रामीण भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात आणि आता उच्च न्यायालयात पुण्याच्या पाणी प्रश्नावर न्याय मागितला जात आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारे प्राधिकरणाकडून पालिकेला पाणी मंजूर केले जाते. परंतु, वाढीव लोकसंख्येचे पुरावे सादर करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे शहराला वाढीव पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वितरणाचा करार संपुष्टात आला असला तरी पालिकेला हवे तेवढे पाणी दिले जात आहे. मात्र, त्यावर हरकत घेत इंदापूरचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत राज्य शासनाला पुणे महापालिकेचे पाणी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पालिकेला वाढलेल्या लोकसंख्येचे अचूक पुरावे सादर करणे भाग पडणार आहे. तसेच सध्या धरणातून पाणी उचलण्याची यंत्रणा पालिकेच्या ताब्यात आहे.परंतु, पुढील काळात पालिकेला मनमानीपध्दतीने पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे पुणे शहराची वाढलेली तहान वेळीच आटोक्यात आणावी लागणार आहे.पुणे महापालिका हद्दीत नवीन ११ गावांचा समावेश झाला आहे.मात्र,अद्याप या गावांमधील सर्व नागरिकांना पालिकेने पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. लोकसंख्येचे पुरावे सादर करताना मात्र या ११ गावांमधील लोकसंख्या गृहित धरली आहे. या गावांमधील नागरिकांना पाणी  उपलब्ध करून देण्याची वेळ आल्यावर सध्या धरणातून घेतले जात असलेले पाणी कमीच पडणार आहे. त्यामुळे वेळीच शहर व ग्रामीण भागाच्या वाढत चाललेल्या पाणी वापराचे योग्य नियोजन करावे लागणार आहे,असेही जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सांगितले.

....

* खडकवासला धरण प्रकल्पात ५ जानेवारी रोजी १७.५१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.धरणात ५ मे रोजी केवळ ५.६१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागाने गेल्या पाच महिन्यात ११.९ टीएमसी एवढा पाणी संपवला असल्याचे स्पष्ट होत आहे.५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत धरणातील ३.४३ टीएमसी पाणी संपले.तर ५ फेब्रुवारी ते ५ मार्च या महिन्याभराच्या काळात 2.7 टीएमसी तर ५ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान १.९४ टीएमसी आणि ५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ३.८३ टीएमसी पाण्याचा वापर झाला.त्यामुळे गेल्या पाच महिन्यात शहर व ग्रामीण भागाने तब्बल बारा टीएमसी पाणी वापरले आहे.परंतु,पुढील काळात उपलब्ध धरणसाठा आणि पाण्याचा वापर यांचा ताळमेळ घालावा लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका