शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 12:01 AM

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.

पुणे : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ. श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संदर्भातील मागण्यांबाबतचे निवेदन तावडे यांच्याकडे पाठविले होते. या निवेदनाबद्दल योग्य ती कार्यवाही करावी, या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष वेधत या प्रयत्नांना बळ पुरविले जाण्याची नितांत गरज आहे, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.महामंडळाने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनासाठी अडीच वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामधील सुमारे३० सूचना, मागण्या, निवेदने, ठराव यांचे स्वरूप चव्हाण यांनी केलेल्या या निवेदनात विशद करण्यात आले आहे.यामध्ये विधान परिषदेवरील घटनाबाह्य नियुक्त्या रद्द करणे, ८४ वर्षे प्रलंबित मराठी विद्यापीठाची मागणी, राज्याचे अद्याप जाहीर न झालेले भाषा धोरण, मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबतची श्वेतपत्रिका, अनुवाद अकादमी आणि बोली विकास केंद्राची स्थापना, अभिजात दर्जासंबंधी चाललेली चालढकल, बंद पडत असलेल्या प्राथमिक शाळा, बृहन्महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भाषा धोरण, राज्य सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना आदींचा समावेश आहे.मराठी भाषेबाबतच्या मागण्या शासन दरबारी पडून असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याचे आवाहन जोशी यांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना केले आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPuneपुणे