शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पुण्याच्या पाणी प्रश्नात स्वाभिमानीची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:41 IST

जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

पुणे: जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. मात्र, शेतक-यांना त्यांच्या वाट्याचे पाणी मिळाले नाही तर जलसंपदा विभागाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी            संघटनेने दिला आहे.त्यामुळे पुण्याच्या पाणी प्रश्नात आता ‘स्वाभिमानी’ने उडी घतली आहे.                   गेल्या काही महिन्यांपासून पुण्याचे पाणी चांगलेच पेटले आहे. बुधवारी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी पालिकेला पाणी पुरवठा करणारे दोन पंप बंद अचानक बंद केले.त्यामुळे यात आणखीच भर पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,सांगूनही जलसंपदा विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत.त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी सिंचन भवन येथे जाणार असल्याची भूमिका पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यानी घेतली.त्यात शेतक-यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात अडचणी येतील,अशी चर्चा सुरू असल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण होत आहे,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता योगेश पांडे यांनी कळविले आहे.                 पांडे म्हणाले, पाण्याच्या काटेकोर नियोजनात पुणे महापालिका व संबंधित विभाग अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना व ग्रामीण भागातील शेतक-यांनाही पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पुण्याचे पाणी नेमके कुठे मुरते ? तसेच शहराच्या भोवती हजारो टँकर इमारतींसाठी पाणी पुरवठा करताना दिसत आहेत.त्यामुळे शेतक-यांच्या वाट्याचे पाणी टँकर माफियांकडून पळवले जात आहे का? तसे असेल तर प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून झोपले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

टॅग्स :WaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी