शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

श्वानदंश जीवघेणा; दीड वर्षात १९ जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:08 AM

शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.

- विशाल शिर्केपुणे : शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात जानेवारी ते जुलै दरम्यान ५ हजार ५८४ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक १ हजार २४४ श्वानदंशाच्या घटना घडल्या. त्यानंतर उपचारात झालेल्या विलंबामुळे तब्बल १० जणांना रेबिजची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकी १ आणि जूनमध्ये २ आणि जुलैमध्ये तीन जणांचा रेबिजने मृत्यू झाला आहे.शहरात २०१७ मध्येदेखील अशीच स्थिती होती. त्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल ९ हजार ३८७ जणांनाश्वानदंश झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये सर्वाधिक ११४५जणांना श्वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली होती. त्यातील १२ जणांना पुढे रेबिजची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले.सर्वाधिक ४ मृत्यूची मे २०१७मध्ये नोंद झाली होती. जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी दोन, जून,आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी १ मृत्यूझाला होता. श्वानदंशानंतर उपचार घेण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे रेबिज लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.दुर्लक्ष नको : कुत्र्यांचे लसीकरण झाले असल्यासही धोका श्वानदंशाबाबत माहिती देताना जनरल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरक म्हणाले की, श्वानदंश झाल्यानंतर, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.जखम झाल्यानंतर, ती धारेच्या पाण्यात साबणाने स्वच्छ करावी. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चार लशींचा डोस घ्यावा. हा डोस संपूर्ण घेतलाच पाहिजे; अन्यथा रेबिजचा धोका कायम राहतो.भटक्या आणि पाळीव श्वानाच्या चाव्यामुळे देखील रेबिजचा धोका असतो. पाळीव श्वानाला लसीकरण केले असले, तरी देखील धोक्याची तीव्रता कायम असते.- महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.- शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून, त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमित पणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. सध्या दररोज सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते.श्वानदंशानंतर जखम २० मिनिटे नळाच्या पाण्याखाली धरून साबणाने धुतली पाहिजे. त्यानंतर तत्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा सरकारी दवाखान्यातून उपचार घेतले पाहिजे. श्वान, मांजर, डुक्कर अशा प्राण्यांच्या चाव्यामुळे अथवा नखाने ओरबडल्याने झालेल्या जखमेमुळेदेखील रेबिज होऊ शकतो. जखम कोणत्या भागात झाली यावरून लशीचा प्रकार ठरतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतले पाहिजेत. श्वानदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आळा घातला पाहिजे.- प्रवीण दरक,अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा