शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सूर्यनारायण तापले! पुण्यात सकाळपासूनच अंगाची लाहीलाही, दुपारी घराबाहेर पडू नका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 10:46 IST

उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत असल्याने शक्यतो दुपारी घराबाहेर पडूच नये

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. पूर्वी पुण्यात उन्हाळ्यात किमान तापमान २० अंशांच्या आसपास असायचे; परंतु, आता हे तापमान २५च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा आहे, तरीही सकाळपासूनच प्रचंड उकाडा आता जाणवत आहे. उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारली आहेत. शहरात तापमान डिस्प्ले करणारी १६४ ठिकाणे आहेत. यामध्ये महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश आहे. पुणे शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तापमानाचा पारा चाळिशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरे तर कोरेगाव पार्कला माेठ्या प्रमाणात झाडी आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळी किमान ३० तर बारा वाजता ३६ अंशांवर

शहरात गुरुवारी सकाळी ९ वाजता किमान तापमान मगरपट्टाला ३० तर शिवाजीनगरला २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर १२ वाजता हेच तापमान वाढून शिवाजीनगरला ३५ तर मगरपट्टा येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून तीन तासांमध्ये झपाट्याने तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.

उष्माघाताचा बसेल फटका

सकाळपासूनच उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत. महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

वीज बंदमुळे उकाड्याने नागरिक त्रस्त

गुरुवारी शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घरात बसलेल्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. घामाच्या धारा असह्य झाल्या. किमान उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानHealthआरोग्यWaterपाणीSocialसामाजिकRainपाऊस