शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सूर्यनारायण तापले! पुण्यात सकाळपासूनच अंगाची लाहीलाही, दुपारी घराबाहेर पडू नका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 10:46 IST

उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत असल्याने शक्यतो दुपारी घराबाहेर पडूच नये

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. पूर्वी पुण्यात उन्हाळ्यात किमान तापमान २० अंशांच्या आसपास असायचे; परंतु, आता हे तापमान २५च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा आहे, तरीही सकाळपासूनच प्रचंड उकाडा आता जाणवत आहे. उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारली आहेत. शहरात तापमान डिस्प्ले करणारी १६४ ठिकाणे आहेत. यामध्ये महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश आहे. पुणे शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तापमानाचा पारा चाळिशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरे तर कोरेगाव पार्कला माेठ्या प्रमाणात झाडी आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळी किमान ३० तर बारा वाजता ३६ अंशांवर

शहरात गुरुवारी सकाळी ९ वाजता किमान तापमान मगरपट्टाला ३० तर शिवाजीनगरला २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर १२ वाजता हेच तापमान वाढून शिवाजीनगरला ३५ तर मगरपट्टा येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून तीन तासांमध्ये झपाट्याने तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.

उष्माघाताचा बसेल फटका

सकाळपासूनच उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत. महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

वीज बंदमुळे उकाड्याने नागरिक त्रस्त

गुरुवारी शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घरात बसलेल्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. घामाच्या धारा असह्य झाल्या. किमान उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानHealthआरोग्यWaterपाणीSocialसामाजिकRainपाऊस