शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 12:16 IST

जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : रब्बी पिकांपेक्षा ऊस लागवडच अधिकराज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेगया काळात देशात देखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक

पुणे : चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २३ हजार ७३० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील तृण व अन्नधान्यांपेक्षा ६ हजार हेक्टरने ऊस क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पर्जन्य छायेतील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. राज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या काळात देशामधेदेखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ, दुष्काळजन्य स्थितीमुळे चारा म्हणून उसाचा झालेला वापर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या ऊस पट्ट्यामध्ये आॅगस्ट महिन्यात आलेला पूर यामुळे २०१९-२० हा अगामी गाळप हंगाम अडचणीत आला आहे. राज्यातील साखर उत्पादन ६० लाख टनापर्यंत खाली घसरेल, असा अंदाज आहे.  जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नीरा धरणातून सोडलेले पाणी, मुठा उजवा कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे दौंड-इंदापूर भागातील भरलेले पाझर तलाव या मुळे शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे. शिरूरमध्ये सर्वाधिक ६,७७५, दौंडमधे ६,०६६ व बारामती तालुक्यात ३,५३८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा ८९ टक्के पाऊस झालेल्या इंदापूर तालुक्यातही १ हजार ५९६ हेक्टरवर ऊस लागण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली. ,.........

जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थितीतालुका                सरासरी                लागवड     क्षेत्र              झालेले क्षेत्रहवेली                   ९५९५                    १४२६मुळशी               १८२१                      ८३१भोर                    १४२५                       ६४५मावळ              १५६६                           ०वेल्हे                 २११.७                         ०जुन्नर               ९६५३                      २४५खेड                   २९२८                        ०आंबेगाव           ३८२७                       ३९८शिरूर             १८,५६९                   ६,७७५बारामती      १६,११७                     ३५३८इंदापूर         ३१,२०१                     १५९६दौंड              ३१,२६१                    ६,०६६पुरंदर         २४५६                        २२०२एकूण          १,३०,६३१               २३,७३०.....................* जिल्ह्यात रब्बी पिकाचे ऊसासह ५ लाख २२ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र असून, पैकी ४१ हजार १५८ हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. 

* ऊस पिक वगळून रब्बीचे क्षेत्र ३ लाख ९१ हजार ८९७ हेक्टर असून, १७ हजार ४२८ हेक्टरवर (४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. 

* उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३१ हेक्टर असून, २३,७३० (१८ टक्के) हेक्टरवर लागवड झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस