शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटींची एफआरपी कारखानदारांनी थकवली - राजू शेट्टी

By राजू इनामदार | Updated: March 25, 2025 18:57 IST

कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? शेट्टींचा सवाल

पुणे: राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी कोरटकर, सोलापूरकर ही माणसे पेरलेली आहेत. उस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटी रूपयांची एफआरपी (उसाची रास्त व किफायतशीर रक्कम) कारखानदारांनी थकवलेली आहे, त्यावर किंवा अन्य महत्वाच्या प्रश्नांवर कोणी बोलू नये म्हणून संवेदनशील विषयांवर बोलण्याची जबाबदारी या प्याद्यांवर दिली आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

शेट्टी यांनी मंगळवारी दुपारी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्दराम सलीमथ यांची भेट घेतली. न्यायालयाने उस उत्पादकांना त्यांच्या उसाची रास्त व किफायशीर रक्कम एकरकमी द्यावी असे आदेश दिले आहेत. तरीही कारखान्यांनी रकमा थकवल्या आहेत. या थकीत रकमांवर शेतकऱ्यांना व्याज देणे कारखान्यांवर बंधनकारक करावे या मागणीसाठी ही भेट घेतली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तरीही राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यात द्यावी असा निर्णय घेतला. तो बेकायदेशीर आहे. या निर्णयाचीही अंमलबजावणी कारखाने करत नाहीत. ते हिशोबही देत नाहीत. कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, थकीत रकमेवर शेतकऱ्यांना व्याज द्यावे अशी संघटनेची मागणी आहे.

रास्त व किफायतशीर किंमत ठरवण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीची साधी बैठकही दीड वर्षात झाली नाही. नुकतीच बैठक बोलावली होती. समितीचे सदस्य आपापल्या गावांमधून मुंबईला येण्यासाठी निघाले. ते पुण्यापर्यंत आल्यावर निरोप मिळाला की बैठक रद्द करण्यात आली आहे. यावरून सरकारला या प्रश्नांचे किती गांभीर्य आहे ते लक्षात येते. काहीतरी वक्तव्ये करून लोकांचे लक्ष भरकटवून द्यायचे हे काम सध्या सुरू आहे. याचा पुनरूच्चार शेट्टी यांनी केला.

कोरटकर चिल्लर माणूस आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. तर आता त्यांनीच मग हा चिल्लर माणूस पोलिसांना तब्बल महिनाभर कसा सापडत नव्हता हेही आता राज्यातील जनतेला सांगावे असे शेट्टी म्हणाले. राज्यात दंगली होत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे सरकार औरंगजेबापेक्षाही आमच्याबरोबर वाईट वागते आमच्याशी, त्याचे काय करायचे? याचे उत्तर मला हवे आहे असे शेट्टी म्हणाले.

कारखान्याचा अध्यक्ष, साखर संघाचा पदाधिकारी अशा विविध पदांवर मी काम केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे.  असे पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले. सरकारचा या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. हे असेच सुरू राहिले तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच राज्यातील सहकार मोडून पडेल अशी भीती जाचक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारsugarcaneऊसFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना