शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटींची एफआरपी कारखानदारांनी थकवली - राजू शेट्टी

By राजू इनामदार | Updated: March 25, 2025 18:57 IST

कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? शेट्टींचा सवाल

पुणे: राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी कोरटकर, सोलापूरकर ही माणसे पेरलेली आहेत. उस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार कोटी रूपयांची एफआरपी (उसाची रास्त व किफायतशीर रक्कम) कारखानदारांनी थकवलेली आहे, त्यावर किंवा अन्य महत्वाच्या प्रश्नांवर कोणी बोलू नये म्हणून संवेदनशील विषयांवर बोलण्याची जबाबदारी या प्याद्यांवर दिली आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

शेट्टी यांनी मंगळवारी दुपारी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्दराम सलीमथ यांची भेट घेतली. न्यायालयाने उस उत्पादकांना त्यांच्या उसाची रास्त व किफायशीर रक्कम एकरकमी द्यावी असे आदेश दिले आहेत. तरीही कारखान्यांनी रकमा थकवल्या आहेत. या थकीत रकमांवर शेतकऱ्यांना व्याज देणे कारखान्यांवर बंधनकारक करावे या मागणीसाठी ही भेट घेतली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तरीही राज्य सरकारने एफआरपी दोन टप्प्यात द्यावी असा निर्णय घेतला. तो बेकायदेशीर आहे. या निर्णयाचीही अंमलबजावणी कारखाने करत नाहीत. ते हिशोबही देत नाहीत. कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, थकीत रकमेवर शेतकऱ्यांना व्याज द्यावे अशी संघटनेची मागणी आहे.

रास्त व किफायतशीर किंमत ठरवण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीची साधी बैठकही दीड वर्षात झाली नाही. नुकतीच बैठक बोलावली होती. समितीचे सदस्य आपापल्या गावांमधून मुंबईला येण्यासाठी निघाले. ते पुण्यापर्यंत आल्यावर निरोप मिळाला की बैठक रद्द करण्यात आली आहे. यावरून सरकारला या प्रश्नांचे किती गांभीर्य आहे ते लक्षात येते. काहीतरी वक्तव्ये करून लोकांचे लक्ष भरकटवून द्यायचे हे काम सध्या सुरू आहे. याचा पुनरूच्चार शेट्टी यांनी केला.

कोरटकर चिल्लर माणूस आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. तर आता त्यांनीच मग हा चिल्लर माणूस पोलिसांना तब्बल महिनाभर कसा सापडत नव्हता हेही आता राज्यातील जनतेला सांगावे असे शेट्टी म्हणाले. राज्यात दंगली होत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे सरकार औरंगजेबापेक्षाही आमच्याबरोबर वाईट वागते आमच्याशी, त्याचे काय करायचे? याचे उत्तर मला हवे आहे असे शेट्टी म्हणाले.

कारखान्याचा अध्यक्ष, साखर संघाचा पदाधिकारी अशा विविध पदांवर मी काम केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे.  असे पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले. सरकारचा या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. हे असेच सुरू राहिले तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच राज्यातील सहकार मोडून पडेल अशी भीती जाचक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारsugarcaneऊसFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना