शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर सुरू होणार गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:11 IST

चाऱ्यासाठी तुटलेला ऊस, लांबलेल्या पावसाचा गळीत हंगामावर परिणाम

ठळक मुद्देराज्य शासनाकडून १ नोव्हेंबर निश्चित :इंदापूर तालुक्यातील तीनही साखर कारखाने दर वर्षी दिवाळीत सुरू होणार

सोमेश्वरनगर : राज्य शासनाने यावर्षी साखर कारखानदारीचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. या निर्णयामुळे आता दिवाळी संपल्यानंतरच, ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, यंदा ऊस गाळपाचे आव्हान पूर्ण करताना कारखाना व्यवस्थापनाची दमछाक होणार आहे. चाऱ्यासाठी तुटून गेलेला ऊस आणि लांबलेल्या पावसाचा गळीत हंगामावर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे. दरवर्षी दसऱ्यालाच जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर पेटतात. यावर्षी मात्र दसरा संपला, तरी बहुतांश कारखान्यांचा बॉयलर पेटला नाही.

दरवर्षी कारखाने उशिरा सुरू करायला नेहमीच कारखान्यांचा विरोध राहिलेला आहे; मात्र यावर्षी दुष्काळामुळे; तसेच चारा छावण्यांना ऊस तुटल्यामुळे करखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस घटला आहे. परिणामी, कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि माळेगाव हे दोन्ही कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून, दोन्ही ही कारखान्याने ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि गेटकेन ऊसधारक यांच्याशी करार पूर्ण केले आहेत. माळेगाव कारखान्याचा बॉयलर पेटला असून, येत्या काही दिवसांत सोमेश्वर कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे. यंदाच्या हंगामात माळेगाव कारखान्याकडे ६ लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. ४ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गेटकेनधारकांचे करार केले आहेत, तर भीमा-पाटस कारखान्याचा जवळपास १ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस माळेगाव कारखान्याची यंत्रणा आणणार आहे.  माळेगावने ११ ते १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज असून, यामध्ये १०० ट्रक, ३०० ट्रॅक्टर, १००० बैलगाड्या, ८०० ट्रॅक्टरचे करार  केले आहेत.  कारखान्याने विस्तारीकरणानंतर प्रथमच मागील गाळप हंगामात १० लाख ७२ हजार ५१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. येणाºया गाळप हंगामाची किरकोळ कामे वगळता, सर्व पूर्व तयारी झाली आहे. ....या गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याकडे २६ हजार ९०० एकर उसाचे क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असून, सभासदांचा ८ लाख ५० हजार मेट्रिक टन, तर गेटकेनधारकांचा १ लाख २५ हजार मे. टन असे साडेनऊ ते दहा लाख टन ऊसगाळपाचे सोमेश्वरचे उद्दिष्ट आहे. 

गेटकेन ऊसधारकांशी करार झाले आहेत. कारखान्यातील अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत; तसेच १ हजार बैलगाडी व ३५० ट्रक- टॅक्टरशी करार पूर्ण झाले असून, त्यांना कराराची पहिली उचलही देण्यात आली आहे. 

दुष्काळामुळे कार्यक्षेत्रातील ऊस कमी झाला असला, तरी परतीच्या पावसामुळे उसाच्या टनेजमध्ये वाढ होणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत बॉयलर पेटणार आहे. १ नोव्हेंबरच्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली......... 

दिवाळीनंतरच साखर कारखान्याची धुराडी पेटणारजंक्शन  : इंदापूर तालुक्यातील तीनही साखर कारखाने दर वर्षी दिवाळीत सुरू होऊन, मे महिन्यात पट्टा पडत असे; परंतु यावर्षी उसाचे क्षेत्र पाण्याची तीव्र टंचाई व  दुष्काळात तेरावा महिना म्हणजे निवडणूक आल्या असल्याने तब्बल दोन महिने उशिरा म्हणजे, दिवाळीनंतरच धुराडी पेटणार आहेत.  दुष्काळामुळे ऊस पिकांना फटका बसला आहे. गाळपायोग्य नसल्याने उशिरा गाळप हंगामास सुरुवात करण्याच्या हालचाली असल्याचे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांनी माहिती दिली. इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमता जवळजवळ २ लाख टन आहे. शंकरराव बाजीराव सहकारी साखर कारखान्यातील गाळप क्षमता जवळजवळ ९ लाख टन आहे. त्यात तालुक्यातील जनावरांचा चारा यासाठी २५ टक्के ऊस वापरण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याच्या वाट्याला किती ऊस येणार, यावर गाळपाचे प्रमाण ठरणार आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यावर्षी गाळप कमी होण्याची चिन्हे आहेत.........

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार