शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 06:00 IST

पुराचा फटका : लांबलेल्या पावसामुळे गत हंगामापेक्षा साखर उत्पादनात घट

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज

पुणे : गेल्यावर्षी पावसाने दिलेली ओढ आणि यंदा पुराने दिलेला फटका अशा संकटात राज्यातील ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरीस अवघे ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात तब्बल १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात कमी उत्पादन झाल्याने यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टनापर्यंत खाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत देशातील उत्पादनाचा आकडा निम्म्याने कमी असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केली आहे.  गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) गाळप हंगामामधे ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. आॅक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर, मराठवाडा आणि सोलापूरात गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. राज्यातील ऊस क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे...लांबलेल्या पावसामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम दीड महिना उशीरा सुरु झाला. नोव्हेंबर अखेरीस ४३ साखर कारखाने सुरु झाले असून, ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नोव्हेंबर-२०१८ रोजी १७५ कारखान्यांनी १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्या हंगामात या काळात देशातील ४१८ साखर कारखाने सुरु झाले होते. त्यातून तब्बल ४०.६९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टन झाले आहे. उत्तरप्रदेशातील १११ साखर कारखान्यांनी १०.८१ लाख टन साखरेचे उत्पादन केले असून, गेल्या हंगामात ते ९.१४ लाख टन होते. कर्नाटकामधील ६१ कारखान्यांनी ५.२१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी ६३ कारखान्यांनी ८.४० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गुजरातमधील गाळप हंगामही लांबलेल्या पावसामुळे २० दिवस उशीरा सुरु झाला. येथील १४ कारखान्यांनी ७५ हजार टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी १६ कारखान्यांनी २.०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. -----------१५ लाख टन साखर निर्यातीचे करार

देशातील साखर कारखान्यांनी तब्बल १५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. त्यात इराण, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि अफ्रिकन देशांचा समावेश असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली. ---------------------------

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस