शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 06:00 IST

पुराचा फटका : लांबलेल्या पावसामुळे गत हंगामापेक्षा साखर उत्पादनात घट

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज

पुणे : गेल्यावर्षी पावसाने दिलेली ओढ आणि यंदा पुराने दिलेला फटका अशा संकटात राज्यातील ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरीस अवघे ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात तब्बल १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात कमी उत्पादन झाल्याने यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टनापर्यंत खाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत देशातील उत्पादनाचा आकडा निम्म्याने कमी असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केली आहे.  गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) गाळप हंगामामधे ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. आॅक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर, मराठवाडा आणि सोलापूरात गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. राज्यातील ऊस क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे...लांबलेल्या पावसामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम दीड महिना उशीरा सुरु झाला. नोव्हेंबर अखेरीस ४३ साखर कारखाने सुरु झाले असून, ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नोव्हेंबर-२०१८ रोजी १७५ कारखान्यांनी १८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्या हंगामात या काळात देशातील ४१८ साखर कारखाने सुरु झाले होते. त्यातून तब्बल ४०.६९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा देशातील साखर उत्पादनच १८.८५ लाख टन झाले आहे. उत्तरप्रदेशातील १११ साखर कारखान्यांनी १०.८१ लाख टन साखरेचे उत्पादन केले असून, गेल्या हंगामात ते ९.१४ लाख टन होते. कर्नाटकामधील ६१ कारखान्यांनी ५.२१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी ६३ कारखान्यांनी ८.४० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गुजरातमधील गाळप हंगामही लांबलेल्या पावसामुळे २० दिवस उशीरा सुरु झाला. येथील १४ कारखान्यांनी ७५ हजार टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी १६ कारखान्यांनी २.०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. -----------१५ लाख टन साखर निर्यातीचे करार

देशातील साखर कारखान्यांनी तब्बल १५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. त्यात इराण, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि अफ्रिकन देशांचा समावेश असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली. ---------------------------

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस