शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 5:28 PM

फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे

पुणे : महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) विकासकामे तसेच आर्यन खान (Aryan khan) प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. हे सरकार राज्यातील संकटे सूर करण्यास असफल ठरत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून होत आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. यांच्यामुळेच कोरोना, अतिवृष्टी, वादळ आले असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. 

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कूल आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ''फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक प्रवक्ता उठतो आणि गांजावाल्याची बाजू मांडतो. हे असलं सरकार म्हणजे पांढऱ्या पायाचे सरकार असून यांच्यामुळे कोरोना आला, दोन वेळा वादळ आलं, दोन वेळा अतिवृष्टी आली असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.'' 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना पडळकर म्हणाले, सरकार मधील काही लोक सहकारी साखर कारखाने आजारी पाडून खरेदी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न पवारांना सोडवता आला नाही. तर राज्याचे प्रश्न काय सोडवणार अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.''

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, अनैसर्गिक सरकार असून तीन पक्षाचे सरकार कायमस्वरूपी राहणार नाही. तसेच पुढील काळात दौंड आणि इंदापूरच्या पाणी प्रश्नासाठी कायम आग्रही राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीharshvardhan patilहर्षवर्धन पाटील