शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

SSC Exam: दहावीच्या परीक्षेत काॅपी प्रकारांत वाढ; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 10:17 IST

उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी १५२ प्रकार असे एकूण २९९ गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली....

पुणे : राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत २९९ गैरप्रकारांची नाेंद झाली आहे. त्यामध्ये काॅपी केल्याप्रकरणी १४५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच डमी विद्यार्थी परीक्षेला बसविल्याप्रकरणी म्हणजेच ताेतयेगिरीच्या २ घटना घडल्या आहेत. उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी १५२ प्रकार असे एकूण २९९ गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.

काॅपी केल्याप्रकरणी सर्वाधिक ८६ प्रकरणांची नाेंद छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर झाली आहे. त्यापाठाेपाठ पुणे विभागीय मंडळात १९, नागपूर १६, लातूर १०, अमरावती ७, नाशिक ६ आणि काेकण विभागात १ काॅपीचे प्रकार घडले आहेत. मुंबई आणि काेल्हापूर विभागीय मंडळात एकाही काॅपी प्रकरणांची नाेंद झालेली नाही. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन तसेच विनंती करणे आदी १५२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यातील सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर मंडळात ७३, नाशिक ४६, काेल्हापूर १५, मुंबई १२, लातूर ४, पुणे २ ची नाेंद करण्यात आली आहे, तर नागपूर, अमरावती आणि काेकणात एकही प्रकार घडलेला नाही.

पुणे, मुंबई मंडळात ताेतयेगिरीचे २ प्रकार

दहावी परीक्षेत पुणे आणि मुंबई विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थ्यास परीक्षेला बसवीत ताेतयेगिरी केल्याचे दाेन प्रकार घडले आहेत.

विभागीय मंडळातील काॅपीचे प्रकार

पुणे : १९

नागपूर : १६

छत्रपती संभाजीनगर : ८६

अमरावती : ७

नाशिक : ६

लातूर : १०

काेकण : १

मुंबई ०

काेल्हापूर ०

गतवर्षी ११६ प्रकरणांची नाेंद

गतवर्षी २०२३ मध्ये काॅपी केल्याप्रकरणी ११६, तर परीक्षेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना साहाय्य केल्याबाबत २ प्रकरणांची नाेंद झाली हाेती. तसेच राज्यात परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर असे एकूण ३६६ गैरप्रकार घडले हाेते.

काॅपीचे प्रकार घडणे हे यंत्रणेचे अपयश

परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत यासाठी राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली हाेती. स्थानिक पातळीवरही पथके लक्ष ठेवून हाेती. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसमाेर शिक्षासूचीचे वाचन केले हाेते. मात्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत काॅपीचे प्रकार घडतात, हे यंत्रणेचेही अपयश आहे.

- शरद गाेसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी