शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:00 IST

४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले....

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरवत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये लाट आहे असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. ४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. राऊत म्हणाले, सरकारी यंत्रणाचा इतका मोठा गैरवापर याआधीच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता. वेठीला धरल्यासारखे सरकारी यंत्रणांना वागवले जात आहे. हा राजकीय क्षेत्रात दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे.

देशाचे वातावरण पाहण्यासाठी म्हणून आपण काही राज्यात गेलो होतो असे राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश या त्यांना त्यांच्या वाटणाऱ्या राज्यासह अनेक राज्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये भाजपच्या राजकारणाचा राग आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी राजकारणाचा जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही. मतदार मतपेटीतून त्यांना याचे बरोबर उत्तर देतील असा दावा राऊत यांनी केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच देशाची राज्यघटना, इतकेच काय तिरंगी ध्वजही मान्य नाही. त्यामुळे राज्यघटना बदलण्यासाठी म्हणूनच त्यांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा हव्यात. तसे नसेल तर त्यांनी देशातील जनतेला ते सांगावे असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतBJPभाजपाpune-pcपुणेcongressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकर