शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:00 IST

४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले....

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरवत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये लाट आहे असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. ४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. राऊत म्हणाले, सरकारी यंत्रणाचा इतका मोठा गैरवापर याआधीच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता. वेठीला धरल्यासारखे सरकारी यंत्रणांना वागवले जात आहे. हा राजकीय क्षेत्रात दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे.

देशाचे वातावरण पाहण्यासाठी म्हणून आपण काही राज्यात गेलो होतो असे राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश या त्यांना त्यांच्या वाटणाऱ्या राज्यासह अनेक राज्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये भाजपच्या राजकारणाचा राग आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी राजकारणाचा जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही. मतदार मतपेटीतून त्यांना याचे बरोबर उत्तर देतील असा दावा राऊत यांनी केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच देशाची राज्यघटना, इतकेच काय तिरंगी ध्वजही मान्य नाही. त्यामुळे राज्यघटना बदलण्यासाठी म्हणूनच त्यांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा हव्यात. तसे नसेल तर त्यांनी देशातील जनतेला ते सांगावे असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतBJPभाजपाpune-pcपुणेcongressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकर