शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:00 IST

४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले....

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकीय क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरवत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये लाट आहे असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. ४०० जागा कशासाठी हव्यात ते त्यांनी देशाला एकदा तरी सांगावे असे ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राऊत यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. राऊत म्हणाले, सरकारी यंत्रणाचा इतका मोठा गैरवापर याआधीच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता. वेठीला धरल्यासारखे सरकारी यंत्रणांना वागवले जात आहे. हा राजकीय क्षेत्रात दहशत पसरविण्याचाच प्रकार आहे.

देशाचे वातावरण पाहण्यासाठी म्हणून आपण काही राज्यात गेलो होतो असे राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश या त्यांना त्यांच्या वाटणाऱ्या राज्यासह अनेक राज्यांमध्ये सामान्य जनतेमध्ये भाजपच्या राजकारणाचा राग आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी राजकारणाचा जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही. मतदार मतपेटीतून त्यांना याचे बरोबर उत्तर देतील असा दावा राऊत यांनी केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच देशाची राज्यघटना, इतकेच काय तिरंगी ध्वजही मान्य नाही. त्यामुळे राज्यघटना बदलण्यासाठी म्हणूनच त्यांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा हव्यात. तसे नसेल तर त्यांनी देशातील जनतेला ते सांगावे असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतBJPभाजपाpune-pcपुणेcongressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकर