शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे, तरीही सकारात्मकता ठेवून बोलावे - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:36 IST

आपल्याकडे पैशांची, तंत्रज्ञानाची कमी नाही पण इमानदारीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे

पुणे: राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे असते, मात्र तरीही सकारात्मकता ठेवून सत्य बोलणे गरजेचे असते. लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा इतका मोठा मी नाही. सगळी मोठी माणसे मोठी असतातच असे नाही असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बऱ्याचदा जी माणसे दूर असतात तीच मोठी असतात. अनुभवाने ते आपल्या लक्षात येते असे ते म्हणाले.

लोकमान्य टिळक ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी टिळक स्मारक मंदिरात गडकरी यांना देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक व्यासपीठावर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, “सत्ताकारण म्हणजे राष्ट्रकारण नाही. लोकमान्य टिळक व त्यांच्याप्रमाणे अनेकांनी जे केले ते राष्ट्रकारण होते. त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा ऑक्सिजन आपण घेतो आहोत. त्यांना स्वराज्य पाहिजे होते व सुराज्यही. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार झाले पाहिजे. आपल्याकडे पैशांची, तंत्रज्ञानाची कमी नाही. इमानदारीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे. लोकमान्यांच्या नावाने स्विकारलेल्या या पुरस्काराने आता जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार करण्यासाठीच यापुढे काम करणार आहे.”

उद्योगव्यवसायाच्या क्षेत्रात आपण आता जपानलाही मागे टाकले आहे. अमेरिका पहिली, चायना दुसरा व आपण तिसरे आहोत. येत्या ५ वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत जगात अग्रगण्य होणार आहे अशा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जगात पहिल्या क्रमाकांवर येण्याची क्षमता भारतात आहे. त्यासाठी ‘जगात जे नाही ते आपल्याकडे हवे’ असा विचार करून पुढे जायला हवे. मुंबई बंगळुरू हायवे व्हाया पुणे या रस्त्याचे काम करणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे अवघा दीड तास लागेल तर बंगळुरू फक्त ५ तासात येईल. इलेक्ट्रिक कारविषयी मी बोललो तर त्यावेळी, ‘हे काहीही सांगतात’ असे बोलले गेले. ती कार प्रत्यक्षात आली. आता हायड्रोजन कार येत आहे. नव्या इंजिनच्या कार येत आहेत. लढणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आपण लढत राहू, त्यातूनच लोकमान्याचे सुराज्याचे स्वप्न पुर्ण होईल असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाPoliticsराजकारणMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार