शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘गीत महाभारत’ पुण्यात रंगणार

By admin | Updated: June 13, 2017 04:25 IST

गीतरामायणाने रसिकमनांवर अधिराज्य गाजवून एक अजरामर काव्यकलाकृतीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अशा प्रकारे महाभारतावरदेखील सुंदर काव्य होऊ

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गीतरामायणाने रसिकमनांवर अधिराज्य गाजवून एक अजरामर काव्यकलाकृतीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अशा प्रकारे महाभारतावरदेखील सुंदर काव्य होऊ शकते, याच प्रेरणेतून अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे राहणारे शशिकांत पानट यांनी व्यासांनी लिहिलेल्या महाभारताच्या कथानकावर गीतलेखन करण्याचे शिवधनुष्य पेलले. महाभारतावर गीत लिहिण्याचा प्रयोग आजपर्यंत एकाही भारतीयाने केलेला नाही. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांवर आधारित ‘गीत महाभारत’ हा सांगीतिक कार्यक्रम येत्या १९ व २० जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री ९.३० वाजता रंगणार आहे. पुराणातल्या कथानकाची ओढ परदेशी राहणाऱ्या भारतीयालाही वाटल्याने ४३ वर्षे अमेरिकेत राहणारे शशिकांत पानट यांनी गीतरामायणातील गीतांमुळे प्रेरित होऊन महाभारतावर आधारित कथानकांवर ही गीते लिहिली. महाभारतातल्या कथानकांचा ६ वर्षे अभ्यास करून मूळ कथानकांच्या आधारावर पानट यांनी ५७ गीतांची पहिली आवृत्ती २००७मध्ये प्रकाशित केली. त्यामुळे या गीतांविषयी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ लागली. गीत महाभारताचा पहिला कार्यक्रम गोव्यात झाला. या अनोख्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाला तब्बल दीडशे लिखित प्रतिक्रियाही मिळाल्या असल्याचे शशिकांत पानट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गीत महाभारताचे महाराष्ट्राबाहेर पाच प्रयोग झाले आहेत. या गीतांना कार्यक्रमातील रसिकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे पानट यांनी आणखी काही कथानकांवर गीते लिहून या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत रूपांतरित केले आहे. या आवृत्तीत आता ६१ गीते प्रसिद्ध झाली. या गीतांचा समावेशही कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या गीतांना गोव्यातील प्रसिद्ध गायक गौरीश तळवलकर यांनी स्वरबद्ध केले आहे. गीत महाभारत या सांगीतिक कार्यक्रमात गायिका सुवर्णा माटेगावकर व गौरीश तळवलकर यांचा सुरेल आवाज ऐकायला मिळणार आहे.